AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज

कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई : शेती उत्पादन वाढवण्यासाठी कायम सरकारचे प्रयत्न राहिलेले आहेत. काजूसाठी पोषक वातावरण असून येथे काजूचे उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. (Government’s efforts to increase Konkan,) कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी (Capital at low interest rates) अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

कोकणाला निसर्गाचे वरदान

कोकणाला निसर्गाचे वरदान आहे. त्यामुळेच या भागात काजूला पोषक वातावरण आहे. या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेऊन या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. भांडवलाअभावी काजू लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून आता तो ही प्रश्न मार्गी लागणार आहे. कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज हे मिळणार आहे. यामुळे उत्पादन वाढणार असल्याचा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही आढावा

काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याअनुशंगाने ही बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते तर यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना

काजूचे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने वाण विकसीत करण्याच्या सुचना यावेळी उपमुख्यमंत्री यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना दिल्या. वाण विकसीत झाले तर उत्पादन वाढण्यात आणखीन मदत होणार आहे. शिवाय स्थानिक पातळीवर काजू शेती करीत असताना शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचाही आढावा त्यांनी व्हीसीद्वारे घेतला आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भरत साळवी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क व काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते. (Government strives to increase cashew production in Konkan, farmers to get low rate loans)

संबंधित बातम्या :

निसर्गाचा कहर त्यात बियाणे कंपनीकडून फसवणूक, 2 एकरावरील फुकोबीवर फिरवला रोटर

‘फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या’ ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव

आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.