AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही

शेती मालाच्या दरात सध्या घट होत असली तरी आता हिवाळ्याच्या तोंडावर (vegetable) भाजीपाल्याचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून भाजीपाल्याची लागवड केली तर उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे.

भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 22, 2021 | 5:11 PM
Share

मुंबई : शेती मालाच्या दरात सध्या घट होत असली तरी आता हिवाळ्याच्या तोंडावर (vegetable) भाजीपाल्याचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून भाजीपाल्याची लागवड केली तर उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे.

कोरोना (corona) काळात भाजीपाल्यांना महत्व प्राप्त झाले होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने याकडे पाहिले जात होते. शिवाय सर्वकाही बंद असतानाही भाजीपाल्याच्या विक्रला परवानगी ही होतीच. त्यामुळे योग्य नियोजन केले तर 60 ते 70 दिवसामध्ये भरघोस उत्पन्न मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या भाजीपाल्याची वैशिष्टे

1. मुळा मुळा ही सर्वात वेगाने वाढणारी भीजापाला आहे. सध्याची वेळ ही मुळाचे बियाणे लावण्याची योग्य आहे. थंड वातावरणात मुळा हा आरोग्यासाठी पोषक असतो तर रासायनिक खताशिवायही याची वाढ होऊ शकते. थंड हवामानात ते सर्वोत्तम मुळा आहेत.

2. पालक पालेभाज्यामध्ये पालक ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे. सर्वात वेगाने वाढणारी भाज्यांपैकी एक असून कोरोनाच्या काळात सकाळी ज्यूस म्हणून हीचे सेवण केले जात होते. मुळाप्रमाणेच पालकही या वेळी लावता येतात आणि थंड हवामानात ही भाजी शरिरासाठी उत्तम असते.

3. बीट बीटरूट ही अत्यंत पौष्टिक आणि वेगाने वाढणारी भाजी आहे. थंडीला सुरवात होण्याच्या 2 आठवडे आगोदर बीट्ची लागवड केली जाऊ शकते

4. काकडी काकडी ही आरोग्यासाठी पोषक आहे. यामुळे शरिरातील पाण्याचा समतोलही राहतो. विशेष म्हणजे काकडी ही वेगाने वाढते आणि तिची जोपासना करणेही अगदी सोपे असते. थंडीला सुरवात होतानाच काकडीचे बियाणे लावले तरी योग्य वेळी खाण्यायोग्य काकडी येते.

5. गाजर गाजर हे दृष्टीसाठी चांगले राहते. मानवी आरोग्याच्या दृष्टीने गाजराचे अनेक फायदे आहेत. याचे उत्पादन लवकर होते शिवाय हा लोणचे खाणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. थंडीचा हंगाम संपण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे आगोदर याची लागवड करावी.

6. वाटाणे मटार हे एक सुपर कोल्ड हार्डी पीक आहे. जे वेगाने वाढणाऱ्या भाज्यांसाठी नक्कीच योग्य आहे. वसंत ऋतू संपताच मटार लावले जातात.

7. कोबी, फुलकोबी सर्वात वेगवान पिकासाठी कोबी, फुलकोबी, ब्रोकोली इत्यादी लावता येतात.

8. बटाटे लागवडीनंतर 60 दिवसांनी बटाट्याचे उत्पन्न हे शेतकऱ्याला मिळते. ही सर्वात महत्वाचे वनस्पती आहे जे आपण बागेत वाढवू शकतो. बटाटे कॅलरीयुक्त असतात, बहुतेक हवामानात वाढण्यास सोपे आणि उत्पादनाची हमी असते. बटाट्याच्या भाज्या न आवडणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनाही आवडतात. बटाटे सरासरी थंडीच्या 2-3 आठवडे आधी लागू केले जाऊ शकतात आणि सुरुवातीच्या वाणांचे उत्पादन 70-80 दिवसांत सुरू होईल. (Higher income in a short period of time, vegetables best options)

संबंधित बातम्या :

आता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची आंदोलने, हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी

दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची

सोयाबीनचे दरही घटले अन् आवकही, शेतकरी वेट अँड वॅाच च्या भुमिकेत

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...