AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची

मंगळवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यातील तब्बल 19 मंडळामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण काढणी झालेल्या पिकांची काळजीही महत्वाची आहे.

दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची
पावसाने खरीपातील पिकांची झालेली अवस्था
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 3:24 PM
Share

लातूर : मंगळवारी मराठवाड्यातील (Rain) आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यातील तब्बल 19 मंडळामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण काढणी झालेल्या पिकांची काळजीही महत्वाची आहे.

कारण काढणी केलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका असतो. (Crop in Safe place) त्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद याची काढणी केली की ते सुखावून ठेवणे गरजेचे आहे. सध्या पावसाचे दिवस असले तरी या दरम्यान पिकांची काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

खरीपातील पिकांचे यापुर्वीच पाऊस आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय अजून दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानेही वर्तवलेला आहे. सध्या खरीपातील केवळ उडीद आणि सोयाबीन ही दोनच पिके वावरात आहेत. सोयाबीनचीही काढणी कामे सुरु असली तरी उशीराने पेरा झालेले सोयाबीन हे वावरात किंवा शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनची साठवणूक केलेली आहे.

काढलेले सोयाबीन एकत्रच साठवून न ठेवता उन्हामध्ये किंवा कोरड्या वातावरणात सुखावणे गरजेचे आहे. आजही शेतकरी हे पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून एकाच जागी साठवणूक करुन ठेवतात. यामुळे शेंगाला बुरशी लागण्याचा धोका संभावतो. त्यामुळे सोयाबीन वाळवूण पुन्हा त्याची गंज लावली तरी पिकाचे नुकसान हे टळणार आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्यास यंत्राच्या सहाय्याने त्वरीत काढणी कामे उरकून घेणे आवश्यक आहे.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

पावसाची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच त्याचे खळे करणे आवश्यक आहे. कारण काढणीनंतर जर पाऊस झाला आणि सोयाबीन, उडीद हे भिजले तर मालाचा दर्जाही ढातळतो आणि पिकाची उगवणही होण्याचा धोका संभावतो त्यामुळे पावसाचे वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की, लागलीच यंत्राच्या सहाय्याने पिक पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.

पावसाचा जोर कायम राहणार

पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरला पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटही पावसानेच होणार असल्याचे चित्र आहे. पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून धान्य हे कोरड्या जागेत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शेतामध्ये असतानाही पावसामुळे आणि काढणीनंतरही पावसामुळेच पिकाचे नुकसान होईल. (Rain for two days, farmers need to take care of crops )

संबंधित बातम्या :

सावधान…! शेती आवजारे घेताना शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या

चिकनपेक्षा मेथी महाग, नागपूरमध्ये भाज्यांचे दर शंभरीपार, मुंबई पुण्यातही भाजापीला महागला; खायचं काय बटाटे?

मुदत अंतिम टप्प्यात तरीही ई-पीक पाहणीचा सावळा गोंधळ सुरुच

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.