AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काजूची शेती करा, मालामाल व्हा, बाजारात 12 महिने मागणी

शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर अधिक भर देत असल्याचं दिसून येतंय. ड्रायफ्रूट्समध्ये काजू मोठ्या प्रमाणात आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे मागणी देखील अधिक असते. उदाहरण बघितल्यास एका झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तीन वर्षांत त्याची रोपे फळे देण्यास तयार होतात. काजू व्यतिरिक्त त्याच्या सालांचाही वापर केला जातो. ही शेती अत्यंत फायदेशीर मानली जाते.

काजूची शेती करा, मालामाल व्हा, बाजारात 12 महिने मागणी
| Updated on: Nov 21, 2024 | 5:30 PM
Share

आज आम्ही तुम्हाला काजूच्या शेतीविषयी माहिती सांगणार आहोत. अर्थातच लखपती नव्हे तर करोडपती होण्याचा हा मार्ग देखील असू शकतो. फक्त योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत लोक खात असलेली वस्तू म्हणजे काजू आहे.

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच काजू खूप आवडतात. गावापासून शहरापर्यंत या वस्तूला नेहमीच चांगली मागणी असते. मग याचीच शेती केली तर? हे शक्य आहे. याविषयी खाली सविस्तर जाणून घ्या.

तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल ज्यात जास्त नफा मिळतो आणि तोट्याचा धोका खूप कमी असतो, तर आज आम्ही तुमच्यासाठी व्यवसाय करण्याचा एक नवीन मार्ग घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय केल्याने खूप नफा होईल. हा व्यवसाय म्हणजे काजूची शेती.

तुम्हाला माहिती आहे की, देशातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. सरकारही आपल्या स्तरावर सातत्याने शेतकऱ्यांना याबाबत जागरूक करत आहे. काजूची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

काजूची लागवड कशी करावी?

ड्रायफ्रूट्समध्ये काजू खूप आवडतो. त्यात एका झाडाचं उदाहरण घेऊया. एका झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तीन वर्षांत त्याची रोपे फळे देण्यास तयार होतात. काजूव्यतिरिक्त त्याच्या सालांचाही वापर केला जातो. सालींपासून रंग तयार केले जातात. त्यामुळे ही शेती अत्यंत फायदेशीर मानली जाते.

उबदार तापमान आवश्यक

उबदार तापमानात काजूची रोपे चांगली वाढतात. त्याच्या लागवडीसाठी 20 ते 35 अंश तापमान चांगले असते. शिवाय कोणत्याही प्रकारच्या मातीत त्याची लागवड करता येते.

काजूची लागवड कुठे केली जाते?

देशातील काजूच्या एकूण उत्पादनात काजूचा वाटा 25 टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये याची लागवड केली जाते. मात्र, आता झारखंड आणि उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्येही याची लागवड केली जात आहे.

काजूपासून किती कमाई?

काजूच्या झाडाला कुंपणानंतर अनेक वर्षे फळे येतात. रोपे लावण्याचा फारच कमी खर्च येतो. एक हेक्टरमध्ये काजूची 500 झाडे लावता येतात. तज्ज्ञांच्या मते, एका झाडातून 20 किलो काजू मिळतो. त्यातून एक हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन मिळते.

त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो. बाजारात काजूचे दर 1200 रुपये किलोपर्यंत आहेत. अशावेळी जास्तीत जास्त झाडे लावून तुम्ही केवळ लखपतीच नव्हे तर करोडपतीही बनू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.