Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे.

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं
‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:44 PM

पुणे : (Unseasonal Rain) अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे (Mango Fruit) आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे. नोव्हेंबरच्या थंडीमध्ये आंब्याला मोहर लागतो पण या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोहर तर गळालाच शिवाय त्याचे परिणाम अद्यापपर्यंत पाहवयास मिळत आहेत. सध्या आंब्याला कैऱ्या येणे अपेक्षित असताना आता कुठे मोहर अंतिम टप्प्यात आहे. अवकाळीने केवळ खरिपातीलच पिकांचे नाही तर फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे.

संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट

आंबा पिकाचा खरा हंगाम सुरु होतो तो नोव्हेंबर महिन्यात. या महिन्यातील थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्यास सुरवात होते. ही प्रक्रिया तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला फळ लागते. पण यंदा सर्वकाही अवकाळीने हिसकावले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मोहर लागत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण क्षमतेने मोहर लागण्यापूर्वीच तो गळाला होता. त्यामुळे आतापर्यंत आंबा फळपिक पोसण्याच्या अवस्थेत असायला पाहिजे होते. तिथे मोहरच लागलेला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. आंबा उशिराने तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादनात मोठी घट या अवकाळीमुळे झाली आहे.

यंदा आंब्याचे दरही वाढीवच राहणार

सध्या फळांचा राजा हापूस हा बाजारपेठेत दाखल झाला असून विक्रमी दर मिळत आहे. सध्या केवळ कोकण भागातील आंबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. उर्वरीत भागातील आंबे बाजारात दाखल होण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी लागणार आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज आहे. शिवाय त्याच्या दर्जावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अवकाळीमुळे वर्षभरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हे नुकासन केवळ वाढीव दरातूनच भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.