AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे.

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं
‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 3:44 PM
Share

पुणे : (Unseasonal Rain) अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे (Mango Fruit) आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे. नोव्हेंबरच्या थंडीमध्ये आंब्याला मोहर लागतो पण या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोहर तर गळालाच शिवाय त्याचे परिणाम अद्यापपर्यंत पाहवयास मिळत आहेत. सध्या आंब्याला कैऱ्या येणे अपेक्षित असताना आता कुठे मोहर अंतिम टप्प्यात आहे. अवकाळीने केवळ खरिपातीलच पिकांचे नाही तर फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे.

संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट

आंबा पिकाचा खरा हंगाम सुरु होतो तो नोव्हेंबर महिन्यात. या महिन्यातील थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्यास सुरवात होते. ही प्रक्रिया तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला फळ लागते. पण यंदा सर्वकाही अवकाळीने हिसकावले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मोहर लागत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण क्षमतेने मोहर लागण्यापूर्वीच तो गळाला होता. त्यामुळे आतापर्यंत आंबा फळपिक पोसण्याच्या अवस्थेत असायला पाहिजे होते. तिथे मोहरच लागलेला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. आंबा उशिराने तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादनात मोठी घट या अवकाळीमुळे झाली आहे.

यंदा आंब्याचे दरही वाढीवच राहणार

सध्या फळांचा राजा हापूस हा बाजारपेठेत दाखल झाला असून विक्रमी दर मिळत आहे. सध्या केवळ कोकण भागातील आंबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. उर्वरीत भागातील आंबे बाजारात दाखल होण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी लागणार आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज आहे. शिवाय त्याच्या दर्जावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अवकाळीमुळे वर्षभरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हे नुकासन केवळ वाढीव दरातूनच भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.