AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे.

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं
‘आंब्याची पाने’ अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय; बीपी नियंत्रणापासून, केस वाढीसाठी आहे उपयोगी.. जाणून घ्या, आंब्याच्या पानांचे फायदे!Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 3:44 PM
Share

पुणे : (Unseasonal Rain) अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे (Mango Fruit) आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे. नोव्हेंबरच्या थंडीमध्ये आंब्याला मोहर लागतो पण या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोहर तर गळालाच शिवाय त्याचे परिणाम अद्यापपर्यंत पाहवयास मिळत आहेत. सध्या आंब्याला कैऱ्या येणे अपेक्षित असताना आता कुठे मोहर अंतिम टप्प्यात आहे. अवकाळीने केवळ खरिपातीलच पिकांचे नाही तर फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे.

संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट

आंबा पिकाचा खरा हंगाम सुरु होतो तो नोव्हेंबर महिन्यात. या महिन्यातील थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्यास सुरवात होते. ही प्रक्रिया तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला फळ लागते. पण यंदा सर्वकाही अवकाळीने हिसकावले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मोहर लागत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण क्षमतेने मोहर लागण्यापूर्वीच तो गळाला होता. त्यामुळे आतापर्यंत आंबा फळपिक पोसण्याच्या अवस्थेत असायला पाहिजे होते. तिथे मोहरच लागलेला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. आंबा उशिराने तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादनात मोठी घट या अवकाळीमुळे झाली आहे.

यंदा आंब्याचे दरही वाढीवच राहणार

सध्या फळांचा राजा हापूस हा बाजारपेठेत दाखल झाला असून विक्रमी दर मिळत आहे. सध्या केवळ कोकण भागातील आंबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. उर्वरीत भागातील आंबे बाजारात दाखल होण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी लागणार आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज आहे. शिवाय त्याच्या दर्जावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अवकाळीमुळे वर्षभरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हे नुकासन केवळ वाढीव दरातूनच भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.