AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता रिमझिम, पिके वाचवण्याची शेतकऱ्यांजवळ संधी

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे तर त्या पोठोपाठ हिंगोलीमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. आता पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असले तरी 22 आणि 23 जुलै रोजी याच दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरम्यानच्या चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांना शेतीकामे उरकून घ्यावी लागणार आहेत. शिवाय 23 ते 28 दरम्यानच्या काळात मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Weather Report : मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता रिमझिम, पिके वाचवण्याची शेतकऱ्यांजवळ संधी
मराठवाड्यात आता रिमझिम पावसाचा इशारा आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 19, 2022 | 5:05 PM
Share

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून (Marathwada) मराठवाड्यासह राज्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान हे झालेच आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे. संपूर्ण पाऊस गायब झाला नसला तरी प्रमाण कमी झाल्याने  (Kharif Season) खरिपातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे तर 22 आणि 23 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना रखडलेली शेती कामे तर करता येणार आहेतच पण पिके वाचवण्यासाठीही विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत.

ढगाळ वातावरण, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा धोका टळला असला तरी या वातावरणामुळे पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिवाय आगोदरच शंकू गोगलगायीने पिके फस्त करण्याचा धडाका सुरु केला आहे. शिवाय आता ढगाळ वातावरणामुळे किडी बरोबरच पिकांमधील तणही वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या मशागती बरोबरच पीक फवारणीही करावी लागणार आहे.

हिंगोली, नांदेडवर वरुणराजाची कृपादृष्टी

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे तर त्या पोठोपाठ हिंगोलीमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. आता पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असले तरी 22 आणि 23 जुलै रोजी याच दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरम्यानच्या चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांना शेतीकामे उरकून घ्यावी लागणार आहेत. शिवाय 23 ते 28 दरम्यानच्या काळात मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनो आता या कामावर लक्ष केंद्रीत करा

पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले आहे.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा