AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : गोगलगायीचा धोका टळणार अन् शेतकऱ्यांना मदतही मिळणार, नेमका काय आहे कृषी विभागाचा उपक्रम?

सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि पावसामुळे झालेले नुकसान पाहता कृषी विभागाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रति हेक्टरावर फवारणी शक्य व्हावी म्हणून शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.

Agricultural : गोगलगायीचा धोका टळणार अन् शेतकऱ्यांना मदतही मिळणार, नेमका काय आहे कृषी विभागाचा उपक्रम?
सोयाबीनवर शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत असून नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 19, 2022 | 3:27 PM
Share

उस्मानाबाद :  (Kharif Season) खरीप हंगामात सर्वाधिक पेरा हा (Soybean Crop) सोयाबीनचा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनवरच अधिकचा भर दिला आहे. असे असतानाच पेरणी होताच पावसाचे थैमान आणि त्यानंतर (Outbreak of snails) शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र, गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरसाठी शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. केवळ एका हेक्टरसाठीच ही रक्कम दिली जाणार आहे. सोयाबीनवरील आकस्मिक किडीचे नियंत्रण करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार तरी कमी होणार आहेच पण गोगलगायीच्या नियंत्रणाबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.

अशी मिळणार आर्थिक मदत

सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि पावसामुळे झालेले नुकसान पाहता कृषी विभागाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रति हेक्टरावर फवारणी शक्य व्हावी म्हणून शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे. फवारणी केलेल्या किंवा इतर किटकनाशकांची पावती ही कृषी कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. केवळ शंकी गोगलगायीमुळे नुकसान झाल्यासच ही मदत केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची पध्दत चुकीची

शंखी गोगलगायीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरीही प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांकडून चुकीची पध्दत राबवली जात असल्याने त्याचा धोका पशू-पक्षांना निर्माण झाला आहे. शेतकरी हे चुरमुऱ्याला विषारी औषध लावून शेतामध्ये फेकतात. त्यामुळे ते इतर पशू किंवा पक्षांनी खाल्ले तर त्यांच्या जीवीतासही धोका निर्माण होतो. त्यामुळे ही पध्दत चुकीची असून शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हा आहे उत्तम पर्याय

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी