AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असली तरी विक्रमी आवकमुळे गेल्या दीड महिन्यापासून चर्चा होती ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची. एकाच दिवशी 1 लाखाहून अधिक कांद्याची आवक या बाजारपेठेमध्ये झाली होती. आतापर्यंतचे कांदा आवकचे सर्व विक्रम यंदाच्या हंगामात मोडीत निघाले होते. शिवाय खरिपात प्रतिकूल परस्थिती असताना ही विक्रमी आवक झाली होती.

Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा
लाल कांद्याबरोबर आता उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 13, 2022 | 2:18 PM
Share

सोलापूर : कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असली तरी विक्रमी आवकमुळे गेल्या दीड महिन्यापासून चर्चा होती ती (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची. एकाच दिवशी 1 लाखाहून अधिक कांद्याची आवक या बाजारपेठेमध्ये झाली होती. आतापर्यंतचे कांदा आवकचे सर्व विक्रम यंदाच्या हंगामात मोडीत निघाले होते. शिवाय (Kharif Season) खरिपात प्रतिकूल परस्थिती असताना ही (Onion Arrival) विक्रमी आवक झाली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सरासरीप्रमाणे आवक सुरु झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. आवक घटल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल 500 ते 700 रुपयांनी दर वाढले आहे. यंदा प्रथमच कांद्याची विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिर राहिले होते. अन्यथा आवक वाढतच कवडीमोल दराने विक्री हे ठरलेलेच होते. सध्या तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3 हजार 500 रुपये तर सर्वसाधारण दर हा 1800 रुपये प्रति क्विंटल आहे. यंदा मुख्य पिकांचे नुकसान झाले असले तरी या नगदी पिकाचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

खरिपातील कांद्याची आवक घटली

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अचानक कांद्याची आवक वाढली होती. पावसाने दिलेली उघडीप आणि कांद्याची नासाडी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी विक्रीची केलेली गडबड यामुळे ही आवक वाढली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 1 लाख क्विंटलहून अधिक असे तीन वेळा आवक झाली होती. त्यामुळे लिलावही बंद ठेवावे लागले होते. आता खरीप हंगामातील कांद्याची आवक कमी झाली आहे. खरीप कांदाच शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे सरासरीप्रमाणे आवक सुरु झाली आहे. दिवसाकाठी 40 ते 45 हजार क्विंटलची आवक होत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच दर स्थिर

खरीप हंगामातील कांदाची आवक सुरु झाली तेव्हा दर कमी होतील अशी शंका होती. मात्र, मागणी अधिकची असल्याने दर कायम टिकून राहिले. शिवाय साठवणूकीसाठी पोषक वातावरण नव्हते म्हणून शेतकऱ्यांनीही विक्रीवरच भर दिला. उलट आता आवक घटली तर दरात चांगली सुधारणा झाली आहे. दराबाबत लहरी असणाऱ्या कांद्याने यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तारलेले आहे. आता उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी कामे सुरु होईपर्यंत अशीच आवक राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

सोयाबीनचाही शेतकऱ्यांना आधार

हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनचाही शेतकऱ्यांना चांगला आधार मिळालेला आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र, आता यामध्ये 100 ते 300 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर 6 हजार 400 पर्यंत गेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे त्यांना याचा अधिकचा फायदा होत आहे. आताचे दर हेच समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी अधिकची अपेक्षा न करता सोयाबीन विक्री करणे गरजेचे असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी काय पण..! आज फॉर्च्यूनर उद्या बीएमडब्ल्यू मधूनही द्राक्ष विक्री झाली पाहिजे, कोल्हापूरच्या बहाद्दराने वेधले लक्ष

Cotton Production : बाजार समितीचा असा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार अन् बाजारपेठही फुलणार, वाचा सविस्तर

गोष्ट पडद्यामागची : शेतकऱ्यांचा रोष पीकविमा कंपन्यावर, मात्र विमा परतावा रखडण्याचे नेमके कारण काय?

Follow Us
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका