AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha : पालकमंत्र्याचा दरबार अन् शेतकऱ्यांना मिळाला हातबार, शेतशिवार होणार आता हिरवागार

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या पाझर तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही लघु सिंचन विभागाच्यावतीने केली जात आहे. बजाज फाऊंडेशनच्यावतीने यंत्राद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर टाकूण दिला जातो. शेतकरी नंतर तो सुपीक गाळ आपल्या शेतात टाकतात. यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

Wardha : पालकमंत्र्याचा दरबार अन् शेतकऱ्यांना मिळाला हातबार, शेतशिवार होणार आता हिरवागार
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 11:29 AM
Share

वर्धा : नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांचा (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या सभागृहात जनता दरबार घेतला जातो. याच दरबारात शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. देवळी तालुक्यातील कोल्हापुर (Pazar Lake) पाझर तलावात गाळ साचल्याने तो काढण्यात यावा आणि हा गाळ लगतच्या शेतकऱ्यांना विनामुल्य उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी या दरबारात करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना हा गाळ (Free) विनामुल्य मिळणार असल्याने शेतजमिनीचा कस वाढणार असून उत्पदनात वाढ होणार आहे.

सुपिक गाळामुळे उत्पादनात वाढ

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या पाझर तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही लघु सिंचन विभागाच्यावतीने केली जात आहे. बजाज फाऊंडेशनच्यावतीने यंत्राद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर टाकूण दिला जातो. शेतकरी नंतर तो सुपीक गाळ आपल्या शेतात टाकतात. यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. या गाळामुळे जमिनीचा कस वाढतो शिवाय तणविरहीत पीक येत असल्याने शेतकऱ्यांचे परिश्रमही कमी होणार आहेत. उत्पादनावर खर्च कमी आणि उत्पन्न अधिक असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे.

कोल्हापूरी तलावातून गाळ उपसा

देवळा तालुक्यातील सात ते आठ गावातील शेतकऱ्यांना या सुपीक गाळाचा लाभ होत आहे. सदर तलावातून 12 हजार घनमिटर गाळाचा उपसा होणार आहे. यामुळे तलाव अधिक क्षमतेते भरणार असून त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. शिवाय सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध झाल्याने शेताची सुपिकता देखील वाढणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना या गाळासाठी एक पैसाही मोजावा लागणार नाही. केवळ वाहतूकीचा खर्च करुन गाळ शेतामध्ये टाकून घेता येणार आहे.

असा हा दुहेरी फायदा

कोल्हापूर पाझर तलावातील गाळ काढणी झाल्याने ह्या तलावाची साठवणूक क्षमता वाढणार आहे. पाण्याचा अधिक साठा झाल्याने या भागातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून तलाावात गाळ साठून राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण हंगाम नव्हे तर अवघ्या काही दिवसांमध्ये हा तलाव तळाला जात आहे. मात्र, आता साठवण क्षमता वाढणार आहे तर दुसरीकडे सुपिक गाळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.