Sugarcane : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

गतवर्षीच्या तुलनेत टनामागे 150 रुपयांची वाढ झाली असली तरी ती साखरेच्या उताऱ्यावर अवलंबून राहणार आहे.10 टक्के उताऱ्यासाठी 2 हजार 900 असा दर गतवर्षी मिळाला होता. तर यंदापासून 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी 3 हजार 50 रुपये असा दर वाहतूक खर्चासहित मिळणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 2.6 टक्के एफआरपीमध्ये वाढ झाली आहे.

Sugarcane : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?
एफआरपी मध्ये वाढ झाल्याने ऊसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 7:50 AM

मुंबई : उत्पादन वाढले तर दरात घट हा बाजारपेठेचा नियम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच असते. पण (Sugarcane Grower) ऊस उत्पादकांच्या बाबतीत तसे होणार नाही. कारण ऊस दराच्याबाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या (FRP) एफआरपीमध्ये तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच (Sugarcane Rate) यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात ही वाढ करण्यात आल्याने याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत होती आता अधिकच्या दरामुळे उसाचे क्षेत्र देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशी असणार आहे वाढ

गतवर्षीच्या तुलनेत टनामागे 150 रुपयांची वाढ झाली असली तरी ती साखरेच्या उताऱ्यावर अवलंबून राहणार आहे.10 टक्के उताऱ्यासाठी 2 हजार 900 असा दर गतवर्षी मिळाला होता. तर यंदापासून 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी 3 हजार 50 रुपये असा दर वाहतूक खर्चासहित मिळणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 2.6 टक्के एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्रामुळे उसाच्या दराबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पण केंद्राच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गतवर्षी वाढत्या उत्पादनामुळे हंगाम लांबणीवर पडला होता. दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे दराबाबत साशंका वर्तवली जात असतानाच केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाहीतर मराठवाड्यात देखील उसाचे क्षेत्र वाढत आहे. देशात सर्वाधिक उसाचे गाळप हे महाराष्ट्रात होत असल्याने त्याचा फायदाही राज्यातील शेतकऱ्यांनाच अधिक प्रमाणात होणार आहे. गेल्या चार वर्षापासून ‘एफआरपी’ च्या दरात वाढ होत आहे. केंद्राने आता साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ करण्याची मागणी होत आहे.

अशी झाली एफआरपी मध्ये वाढ

ऊस उत्पादनावरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त होते. आता दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2019-20 पासून सुरु असलेली वाढ यंदाही कायम राहिलेली आहे. रास्त आणि किफायतशीर दर मिळत असल्याने आता पुन्हा ऊस क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज आहे. 2019-20 मध्ये एफआरपी 2 हजार 750 एवढा होता तर 2020-21 मध्ये 2 हजार 850 तर गतवर्षी 2 हजार 900 व यंदा तो 150 रुपायांनी वाढून थेट 3 हजार 50 वर येऊन ठेपला आहे.

ही पण बातमी वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.