AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : परतीच्या वाटेवर असणारे उसतोड मजुर घरी परतलेच नाहीत, नेमके बीडमध्ये झाले तरी काय?

ऊस तोडीनंतर हिशोब करुन हे पैसे मुकादमाला देण्याचे ठरले पण हंगाम संपल्यानंतरही मजुरांकडेच पैसे फिरले. पैशाची मागणी करीत दत्ता गव्हाणे यांनी लेकराबाळासह 14 जणांना डांबून ठेवले होते.

Beed : परतीच्या वाटेवर असणारे उसतोड मजुर घरी परतलेच नाहीत, नेमके बीडमध्ये झाले तरी काय?
उसतोड मजुरांना पैशासाठी डांबून ठेवल्याचा आरोप मजुरांच्या नातेवाईकांनी तक्रारीद्वारे केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 1:46 PM
Share

बीड:  (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून आता उसतोड (Sugarcane Worker) मजुरांनी परतीचा वाट धरली आहे. यंदा दोन महिन्याने हंगाम लांबल्याने मजुरांची पावले ही गावाकडे ओढ घेत होती. असे असतानाही (Beed District) बीड जिल्ह्यातील मजूर हे आपल्या गावी परतले नाहीत. त्यांच्याकडे पैसे थकीत असल्याने एका मुकादमाने त्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. तब्बल 14 जणांना 8 दिवसांपासून डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. कारखाना बंद झाल्यानंतरही संबंधित मुकादमाचे पैसे हे या उसतोड मजुरांकडे फिरत होते. त्यामुळे मुकादमाने पैशाची मागणी करीत 14 मजूरांना डांबून ठेवले होते.

8 दिवसांपासून एकाच खोलीत मजूर

ऊस तोडणीसाठी मजूर हे मुकादमाकडून अॅडव्हान्स म्हणून पैसै घेतात. त्याच अनुशंगाने गेवराई तालुक्यातील मजुरांनी दत्ता गव्हाणे या मुकादमाकडून पैसे घेतले होते. ऊस तोडीनंतर हिशोब करुन हे पैसे मुकादमाला देण्याचे ठरले पण हंगाम संपल्यानंतरही मजुरांकडेच पैसे फिरले. पैशाची मागणी करीत दत्ता गव्हाणे यांनी लेकराबाळासह 14 जणांना डांबून ठेवले होते. सर्व मजूर हे गेवराई तालुक्यातील आहेत.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गाळप हंगाम संपल्यानंतर 4 दिवसांमध्ये मजूर गावी परत येणे अपेक्षित होते. पण आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी हे परतले नसल्याचे मजुरांच्या नातेवाईकांना कळाले. त्यानंतर कारखान्याकडे चौकशी केली असता सर्व मजूर हे गावी परत गेल्याचे सांगण्यात आले मात्र, मुकदमानेच पैशासाठी त्यांना डांबून ठेवल्याची तक्रार मजुरांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे आता या घटनेमागे नेमकं दडलंय काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

असा होतो ऊस तोडणीचा व्यवहार

हंगामाच्या सुरवातीला मुकादमाला मजूर मिळणे तसे जिकिरीचे काम असते. मात्र, साखर कारखान्यासोबत मुकादमाने व्यवहार केलेला असल्याने ऊसतोड तर करावीच लागणार आहे. त्यामुळे मुकादम हे ऊसतोड मजुरांना उचल म्हणून तोडणी करण्यापूर्वीच पैसे दिले होते. आता दत्ता गव्हाणे हे मजुरांना पैसे देत गेले. आता हंगाम संपल्यानंतर ही बाब समोर आली आहे. मजुरांकडेच पैसे फिरत असल्याने त्यांना चक्क आठ दिवस डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.