AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजावर अवकळा, अतिवृष्टीमुळे 10 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

आर्वी गावातील एका शेतकऱ्याला 10 एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यावर ही अवकळा आली आहे.

बळीराजावर अवकळा, अतिवृष्टीमुळे 10 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ
| Updated on: Nov 08, 2020 | 2:14 PM
Share

वर्धा : अतीवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाल्याने शेतकरी हतबल आहे. सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. आर्वी गावातील एका शेतकऱ्याला तब्बल 10 एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यावर ही अवकळा आली आहे. (loss of 10 acres soybean crop of arvi village farmer crop destroyed by tractor)

जिल्ह्यीतील आर्वी गावात श्रीकृष्णा दारोकर नावाचे शेतकरी शेती करतात. कमी कालावधित चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी 10 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. दिवसरात्र काबाडकष्ट करुन त्यांनी चांगलं पीक उभं केलं. चांगला उतारा यावा म्हणून त्यासाठी फवारणी, खतपेरणीदेखील केली. त्यासाठी एकूण सव्वा लाख रुपयांचा खर्चही केला. मात्र, निसर्गाने ऐन वेळी धोका दिल्याने सोयाबीन पिकाची नासधूस झाली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आणि आर्वी परिसरात जोरदार पाऊस झाला. तसेच विविध रोगांचा प्रादुर्भावही सोयाबीनवर झाला. त्यामुळे दारोकर यांच्या हातचे पीक गेले; शेवटी उत्पन्नाची आणि नफ्याची हमीच नसल्याने त्यांना 10 एकर शेतातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. पण निसर्गाच्या अवकृपेने सगळं हिरावून नेलय. सोयाबीन काढून एकही रुपया मिळणार नसल्यान उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्याला अतीवृष्टीचा सामना करावा लागला. पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 80 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. खरीप हंगामात एकूण 1 लाख 37 हजार 266 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. सुरुवातीला  पिकाची समाधानकारक वाढ झाली. पण ऐन वेळेवर पाऊस आणि रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीनची नासधूस झाली. अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील एकूण सोयाबीनपैकी 1 लाख 15 हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पन्नाचा दुसरा कुठलाही मार्ग नल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. सरकारने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

दिवाळी आली, तरीही कपाशी खरेदीला मुहूर्त मिळेना, वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल

मणिपूरचा प्रसिद्ध काळा तांदूळ धुळ्यात, अभिनव प्रयोगाने शेती फुलवली

अतिवृष्टीमुळे कीड लागल्याने हवालदिल शेतकऱ्यांची द्राक्ष बागांवर कुऱ्हाड; लाखो रुपयांचे नुकसान

(loss of 10 acres soybean crop of arvi village farmer crop destroyed by tractor)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.