AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखान्यांचे गाळप परवाने थांबवले, शेतकऱ्यांना 90 कोटी मिळाले,सरकारच्या प्रयत्नाला यश

साखर कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची एफआरपीची थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारला होता.

साखर कारखान्यांचे गाळप परवाने थांबवले, शेतकऱ्यांना 90 कोटी मिळाले,सरकारच्या प्रयत्नाला यश
साखर कारखान्याचे संग्रहीत छायाचित्र
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 18, 2021 | 9:02 AM
Share

पुणे : साखर कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची एफआरपीची थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारला होता. शेतकऱ्यांची एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाचे परावने न देण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केला होता. राज्यातील जवळपास 43 साखर कारखान्यांचे गाळप परवाने थांबवण्यात आले करण्यात आले होते.

21 कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 90 कोटी दिले

एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राज्यातील 43 पैकी 21 कारखान्यांनी सुमारे 90 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली

22 साखर कारखान्यांचे परवाने रोखले

एफआरपीनं दिल्यामुळे उर्वरित 22 साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळालेला नाही. एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एफआरपी दिल्यास परवाने देणार

एफआरपी थकविलेल्या 21 कारखान्यांनी सुमारे 90 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित 22 कारखान्यांनी एफआरपी दिल्यानंतरच त्यांना गाळप परवाना देण्यात येईल, असं साखर आयुक्तालयाकडून कळवण्यात आलं आहे.

साखरेचं उत्पादन वाढणार

यंदा गतवर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कारण ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून गतवर्षी 10 कोटी 20 लाख टनाचे उत्पादन झाले होते. यंदा पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे उत्पादन वाढणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले होते.

शेतकऱ्यांचे पैसे द्या अन् परवानगी घ्या

एफआरपी रक्कम थकीत ठेवणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक आहे. कारखाने सुरु होण्यापूर्वी संचालकांकडून मोठ-मोठी आश्वासने दिली जातात. यामागचा उद्देशच हा आहे की गाळपासाठी अधिकचा ऊस कारखान्याकडे आणला जावा. मात्र, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा दिला की परवानगीही देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

इतर बातम्या:

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच प्रस्ताव, 35 हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना फायदा होणार

विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत

Maharashtra 22 Sugar Factories gave FRP to farmers and get permission but 21 sugar mills not paid money of sugarcane

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.