तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज

Monsoon Rain Update : मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला.

तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात 'या' तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 7:42 AM

मुंबई : वाढलेल्या तापमानात पाऊस कधी बरसणार, याकडे सगळ्याची नजर लागलीय. यंदा मान्सून (Monsoon Rain) लवकर बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी मान्सूनचे आगमनाची तारीख चुकवली आहे. 27 तारखेला मान्सून केरळात (Monsoon in Keral) दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसून येत्या 48 ते 72 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्यानंतर आठ ते दहा दिवसांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्र (Maharashtra Monsoon Update) आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र असनी चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमानवर झाला आहे. त्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसंच शुक्रवारीहीदेखील पावसाची सीमा आणखी उत्तरेकडे सरकली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

ट्वीटमध्ये काय म्हटलं?

ढगाळ वातावरणाने काहिली वाढली

सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा आणखी वाढलाय. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरीही लावली. मात्र त्यानंतर तापमान पुन्हा वाढलं. परिणामी लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. अशातच मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा सगळ्यांना आहे.

पाहा व्हिडीओ : तीन दिवसांपूर्वी नागपुरात मुसळधार

मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला. मात्र अद्याप केरळमध्ये मान्सून पोहोचलेला नसल्यानं महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमनही लांबणार आहे. त्यामुळे 5 जून ऐवजी दहा जूनला मान्सूनचा पाऊस राज्यात बरसेल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

पेरणीची घाई नको!

दरम्यान, पेरणीची घाई करु नये, असं आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता मान्सूनचं आगमन लांबल्यानं शेतकरीची नजर आभाळाकडे लागली आहे. दरम्यान, मान्सून अंदमान आधीच दाखल झाला असून त्याचा प्रवास केरळच्या दिशेनं सुरु आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचा पाऊस केरळमध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.