AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज

Monsoon Rain Update : मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला.

तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात 'या' तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरणImage Credit source: tv9
| Updated on: May 28, 2022 | 7:42 AM
Share

मुंबई : वाढलेल्या तापमानात पाऊस कधी बरसणार, याकडे सगळ्याची नजर लागलीय. यंदा मान्सून (Monsoon Rain) लवकर बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी मान्सूनचे आगमनाची तारीख चुकवली आहे. 27 तारखेला मान्सून केरळात (Monsoon in Keral) दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसून येत्या 48 ते 72 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्यानंतर आठ ते दहा दिवसांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्र (Maharashtra Monsoon Update) आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र असनी चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमानवर झाला आहे. त्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसंच शुक्रवारीहीदेखील पावसाची सीमा आणखी उत्तरेकडे सरकली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ट्वीटमध्ये काय म्हटलं?

ढगाळ वातावरणाने काहिली वाढली

सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा आणखी वाढलाय. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरीही लावली. मात्र त्यानंतर तापमान पुन्हा वाढलं. परिणामी लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. अशातच मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा सगळ्यांना आहे.

पाहा व्हिडीओ : तीन दिवसांपूर्वी नागपुरात मुसळधार

मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला. मात्र अद्याप केरळमध्ये मान्सून पोहोचलेला नसल्यानं महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमनही लांबणार आहे. त्यामुळे 5 जून ऐवजी दहा जूनला मान्सूनचा पाऊस राज्यात बरसेल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

पेरणीची घाई नको!

दरम्यान, पेरणीची घाई करु नये, असं आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता मान्सूनचं आगमन लांबल्यानं शेतकरीची नजर आभाळाकडे लागली आहे. दरम्यान, मान्सून अंदमान आधीच दाखल झाला असून त्याचा प्रवास केरळच्या दिशेनं सुरु आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचा पाऊस केरळमध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.