AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ई-पीक पाहणी’त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

'ई-पीक पाहणी'त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 4:59 PM
Share

लातूर : ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पीकांची नोंदणी करण्यास केवळ दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय आकडेवारी ही आता समोर येत आहे. या मोहिमेच्या सुरवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केलेल्या नांदेड जिल्ह्यानेच मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. पीक पेरा नोंदणीची सुरवात ही 15 ऑगस्टपासून झाली होती. तेव्हापासून महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 19 लाख 62 हजार 64 पेरा नोंदणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात तीन लाख 52 हजार 691 नोंदी झाल्या आहेत. या नोंदणी मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर व तिसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा आहे.

जनजागृतीचा परिणाम

या मोहिमेच्या सुरवातीला शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत होते तर ही जबाबदारी शेतकऱ्यांची असल्याचे सांगत महसूल विभागाचे अधिकारी कानडोळा करीत होते. त्यामुळे सुरवातीला नांदेड जिल्ह्यात कमी नोंदी झाल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गावागावत जाऊन या अॅपची माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचे आदेश दिले होते. तर गावस्तरावर ज्यांना अत्याधुनिक प्रणालीची माहिती आहे अशा युवकांची नेमणूक केली होती. त्यामुळे नोंदणी ही वाढलेली आहे. वेगवेगळ्या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक पेऱ्याच्या नोंदी झाल्या आहेत.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील नोंदी

नांदेड 3,52, 691 लातूर – 3,03,070 उस्मानाबाद – 2,56,038, जालना – 2,40,612, बीड – 2,35,082, औरंगाबाद – 2,16,778, हिंगोली – 1,87,163, परभणी – 1,40,630 (nanded-ranks-first-in-marathwada-in-e-crop-inspection-initiative-benefits-from-awareness)

संबंधित बातम्या :

‘झिरो बजेट शेती’ ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज

सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.