AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ई-पीक पाहणी’त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

'ई-पीक पाहणी'त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 4:59 PM
Share

लातूर : ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पीकांची नोंदणी करण्यास केवळ दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय आकडेवारी ही आता समोर येत आहे. या मोहिमेच्या सुरवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केलेल्या नांदेड जिल्ह्यानेच मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. पीक पेरा नोंदणीची सुरवात ही 15 ऑगस्टपासून झाली होती. तेव्हापासून महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 19 लाख 62 हजार 64 पेरा नोंदणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात तीन लाख 52 हजार 691 नोंदी झाल्या आहेत. या नोंदणी मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर व तिसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा आहे.

जनजागृतीचा परिणाम

या मोहिमेच्या सुरवातीला शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत होते तर ही जबाबदारी शेतकऱ्यांची असल्याचे सांगत महसूल विभागाचे अधिकारी कानडोळा करीत होते. त्यामुळे सुरवातीला नांदेड जिल्ह्यात कमी नोंदी झाल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गावागावत जाऊन या अॅपची माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचे आदेश दिले होते. तर गावस्तरावर ज्यांना अत्याधुनिक प्रणालीची माहिती आहे अशा युवकांची नेमणूक केली होती. त्यामुळे नोंदणी ही वाढलेली आहे. वेगवेगळ्या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक पेऱ्याच्या नोंदी झाल्या आहेत.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील नोंदी

नांदेड 3,52, 691 लातूर – 3,03,070 उस्मानाबाद – 2,56,038, जालना – 2,40,612, बीड – 2,35,082, औरंगाबाद – 2,16,778, हिंगोली – 1,87,163, परभणी – 1,40,630 (nanded-ranks-first-in-marathwada-in-e-crop-inspection-initiative-benefits-from-awareness)

संबंधित बातम्या :

‘झिरो बजेट शेती’ ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज

सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.