AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी वीज धोरण योजनेत नाशिकचं बोकडदरे अग्रेसर, ग्रामस्थांकडून 22 लाखांचा वीज बिल भरणा

महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या कृषीपंप थकीत वीज ग्राहकांसाठी कृषी वीज धोरण 2020 योजना आणली आहे. Agriculture Electricity Scheme

कृषी वीज धोरण योजनेत नाशिकचं बोकडदरे अग्रेसर, ग्रामस्थांकडून 22 लाखांचा वीज बिल भरणा
बोकडदरे
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 30, 2021 | 3:08 PM
Share

नाशिक: महावितरण कंपनीच्या कृषी वीज धोरण 2020 योजनेमध्ये निफाड तालुक्यातील बोकडदरे गाव अव्वल ठरलं आहे. येथील 180 वीज ग्राहकांनी यामध्ये सहभाग नोंदवत 22 लाख रुपयांचा शंभर टक्के वीज बिल भरणा केला. बोकडदरे गाव यामुळे राज्यात अग्रेसर ठरले. (Nashik Bokaddare villagers pay twenty lakh rupees electricity bill to Mahadiscom under Agriculture Electricity Scheme 2020)

महावितरणकडून जनजागृती

निफाड तालुक्यातील बोकडदरे गावातील थकीत वीज ग्राहकांना महावितरण कृषी वीजबिल 2020 या योजनेची माहिती ग्रामसभा घेऊन सांगितली. महावितरणनं योजनेबाबत जनजागृती करुन धोरण ग्रामस्थांना समजून सांगितले. योजनेतील 33 टक्के रक्कम गावातील विद्युत व्यवस्थेवर खर्च केली जाणार असून गावाच्या विकासाला भर मिळणार असल्याचं ग्रामस्थांना सांगण्यात आले. महावितरणचा विचार पटल्यानं 180 थकीत वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत 22 लाख रुपये भरले असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियाता बनकट सुरवसे यांनी सांगितलं.

कृषी वीज धोरणांतर्गत 70 टक्के थकबाकी माफ

महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या कृषीपंप थकीत वीज ग्राहकांसाठी कृषी वीज धोरण 2020 योजना आणली आहे. ही योजना अत्यंत चांगली असून थकीत वीज ग्राहकांना यात 70 टक्के माफी मिळणार आहे. तर, उर्वरित रकमेतील 33 टक्के रक्कम गाव पातळीवर विद्युत व्यवस्थेवरखर्च होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी 22 लाख रुपये भरणा केला. महावितरणला यामधून मोठा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे गावात कामे होणार असल्याने बोकडदरे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असं भाऊराव दराडे या शेतकऱ्यानं सांगितलं.

गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण

22 लाख रक्कम जमा होत राज्य अव्वल आलेल्या बोकडदरे गावातील विजेचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आपआपल्या गावातील नागरिकांनी महावितरणच्या या योजनेत सहभागी होत आपले विजेचे प्रश्न मार्गी लावावेत, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

ऊर्जामंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक, वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेची पोलीस ठाण्यात तक्रार

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी

(Nashik Bokaddare villagers pay twenty lakh rupees electricity bill to Mahadiscom under Agriculture Electricity Scheme 2020)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली