AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येहून येताच मुख्यमंत्र्यांनी ज्या जिल्ह्याला भेट दिली, तिथला नुकसानीचा अहवाल रात्रीतून आला, पाहा काय आहेत आकडे?

जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासन पातळीवर जोरदार हालचाली वाढल्या आहेत.

अयोध्येहून येताच मुख्यमंत्र्यांनी ज्या जिल्ह्याला भेट दिली, तिथला नुकसानीचा अहवाल रात्रीतून आला, पाहा काय आहेत आकडे?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 11, 2023 | 12:39 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झाले होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याच दरम्यान राज्यात शेतकऱ्यांवर संकट आलेले असतांना मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अयोध्येत देवेदर्शन सुरू होते. त्याच वेळेला राज्यातील विरोधकांनी टीका सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी थेट नाशिक गाठलं होतं. नाशिकच्या सटाणा भागात केलेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यामध्ये लवकरात लवकर पंचनामे करून मदत केली जाईल शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

त्यानंतर एक रात्रीतून कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाला प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याकडून हा अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या काळात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून तब्बल 208 गावांचा यामध्ये समावेश आहे.

नाशिक जिलयातील जवळपास 25 हजर 985 शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये झाल्याचा प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसाच्या पावसात शेतकऱ्यांचे तब्बल 12 हजार 909 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले असून 10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला आहे. काढणीला आलेला कांदा तर काढून गंजी करून ठेवलेला कांदा सुद्धा खराब होणार आहे.

कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. एकूणच फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अक्षरशः कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत असतांना अवकाळीचे संकट कोसळले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेले असताना शेतीचं झालेले नुकसान पाहता त्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला फटका पाहून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले होते.

त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेला अहवाल बघता संपूर्ण जिल्हयातील शेतकरीच जवळपास अडचणीत सापडले आहे. त्यामुळे प्राथमिक अहवाल शासन दरबारी एका रात्रीतून गेल्यानंतर प्रत्यक्षात मदत कधी मिळते याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत