Onion Rate : कांद्याचा वांदाच..! खरिपात झाले तेच रब्बीत, कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हतबल

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे.

Onion Rate : कांद्याचा वांदाच..! खरिपात झाले तेच रब्बीत, कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हतबल
कांदाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 4:48 PM

लासलगाव : सध्याच्या महागाईत केवळ कांदा हा सर्वसामान्यांना दिलासा देत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाण्यात आणत आहे. गेल्या चार महिन्यांपासून (Onion Rate) दरात सुरु असलेली घसरण आजही कायम आहे. त्यामुळे यंदा सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही. बाजारपेठेतील घटती मागणी आणि वाढते उत्पादन यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याला 15 रुपये किलोपेक्षा अधिकचा दर हा मिळालेलाच नाही.  (Lasalgaon Market) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 6 रुपये किलो पासून ते 14 रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे कांद्याचा भाव एवढा कमी झालाय की उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झाले आहे. असे असतानाही सध्या राज्यभर कांदा लागवड आणि पेरणीही होत आहे.

नाफेडमुळे आधार अन् नुकसानही

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे. नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे पुढील महिन्यापासून देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाफेडणे खरेदी केलेला कांद्याचा निकस सुरू होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याचा आणखी वांदा होईल असेच चित्र आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा वाढीव अनुदानाची

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणारा उन्हाळा कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीत साठवून ठेवला होता. चांगला दर मिळेल यापेक्षाने अनेक शेतकरी अजूनही कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतके दिवस कांदा साठवूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने केंद्र व राज्य सरकारने कांद्याला किलोला 10 रुपये अनुदान तसेच निर्यातील प्रोत्साहन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा

तरीही कांदा लागवड जोमात

कांद्याला दर नाही म्हणून लागवड क्षेत्र घटले असे नाही. सध्याच्या खरीप हंगामात कांदा लागवड ही महिन्याभराने लांबणीवर पडलेली आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे कांदा रोपाचे नुकसान झाले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांचा भर कांद्यावरच आहे. कांद्याचे दर एका रात्रीतून वाढतात. त्यामुळे फायदा किंवा नुकसान असा विचार करुन शेतकरी कांद्याचे उत्पादन हे घेतातच. तोच प्रकार यंदाही राज्यभर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे क्षेत्र तर वाढले पण दराचे काय होणार हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.