AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या ‘कृऊबा’ चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा

शेतकऱ्यांच्या हीतासाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्यांनी जर योग्य ती भूमिका घेतली तर काय होऊ शकते हे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील लातूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलावच सुरु केला आहे.

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या 'कृऊबा' चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा
संग्रहित
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 11, 2021 | 11:19 AM
Share

औरंगाबाद : पिकाचे उत्पादन काढणे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे या सर्व बाबी शेतकरी करतो. मात्र, आपणच उत्पादित केलेल्या मालाचा दर तो ठरवू शकत नाही. आता (Agricultural Income Market Committee) बाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांची मनमानी वाढत आहे. त्यामुळे कष्ट करुन तरी पदरी निराशाच हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांच्या हीतासाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्यांनी जर योग्य ती भूमिका घेतली तर काय होऊ शकते हे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील लातूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलावच सुरु केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी वेगळा पर्याय निर्माण झाला असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या बाजारात कापसाला 8 हजार 430 रुपये क्विंटलला दर मिळाला आहे.

यामुळे बाजारपेठेचे वेगळेपण टिकून

औरंगाबाद जिल्ह्यात नंबर दोनची बाजारपेठ म्हणून या लातूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार उल्लेख केला जातो. या बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून शेतीमालाची आवक ही सुरु असते. पण चर्चा असते ती नाविन्यपूर्ण उपक्रमाची. यापूर्वीही कांद्याचे दर घटलेले असताना बाजार समितीच्या आवारातच मोकळ्या कांद्याचा लिलाव करण्यात आला होता. (Open Cotton Market) खुल्या मार्केटमुळे कांद्यालाही (Good Rate) चांगला दर मिळाला होता. आता कापूस पिक हे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शेतीमालाच्या दर्जानुसारच दर ठरला जातो. शिवाय येथे व्यापाऱ्यांची मनमानी नाही तर संचालक मंडळाकडूनच दर काढले जातात.

शेतकऱ्यांमध्ये म्हणून घेतला निर्णय

मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटत असले तरी उत्पादित कापसाला योग्य दर हा मिळालाच पाहिजे. पण येथील बाजार समितीमध्ये व्यापारी मनमानी दर ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. यासंबंधी तक्रारीही संचालक मंडळाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बाजार समिती उभारण्याचा उद्देशच साध्य होत नसेल तर काय उपयोग म्हणून असा खुला बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे संचालक वाल्मीक चव्हाण यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांमध्येही समाधान

कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलाव सुरु केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथील दराप्रमाणेच आता व्यापाऱ्यांनाही दर ठरवावे लागणार आहे. यामध्ये स्पर्धा निर्माण झाली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनाच अधिकचा होणार आहे. शुक्रवारी खुल्या लिलावात कापसाची आवक कमी झाली असली तरी सोमवारपासून आवक वाढणार असल्याचे वाल्मीक चव्हाण यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका

ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ

थंडीमध्ये जनावरांची ‘अशी’ काळजी घ्या, गोष्टी छोट्याच पण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या..!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?