AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक विमा योजना: पिकाच्या नुकसानाची माहिती 72 तासात कळवा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन

पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

पीक विमा योजना: पिकाच्या नुकसानाची माहिती 72 तासात कळवा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 24, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आणि नैसर्गित संकटात दिलासा देण्यासाठी 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेल्या पिकाचं नुकसान झाल्यास विमा परतावा देण्यात येतो. तर, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं महत्त्वाचं आवाहन केलं आहे.   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाची माहिती कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती देण्याचे आदेश

खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधिता क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल. शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. तर , अधिक तपशिलासाठी तात्काळ जवळच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी सपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलंय. तर, राज्य सरकारनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.

कर्नाटक सरकारचा नवा नियम

कर्नाटक सरकारनं पीक विम्यासंदर्भात नवा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कर्नाटकात आता विमा कंपन्यांना पीक विमा योजना सुरु करत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचं नामनिर्देशन करुन घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. कर्नाटकातील कृषी मंत्री बी सी पाटील यांनी विमा कंप्यांना या संदर्भातील आदेश दिले आहेत. तर, पीक विमा कंपन्यांनी जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यालयं सुरु करण्याऐवजी कृषी विभागाबाहेर त्यांनी त्यांची कार्यालयं सुरु करावीत, त्याच्या जीपीएस लिंक द्याव्यात, असाही आदेश दिला आहे.

इतर बातम्या:

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर

PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

PMFBY Latest update Maharashtra Government appeal to provide details of crop loss and karnataka government change rule of irect benefit name of nominee to be added in policy cover

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!.

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं.

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली