AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या सोयाबीन दराला आता पोल्ट्री धारकांचा विरोध, काय आहेत कारणे?

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तेच आता प्रत्यक्ष बाजारपेठेत होत आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. आठ दिवसांमध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या दराला आता पोल्ट्री ब्रीडर्सचा विरोध होत आहे.

वाढत्या सोयाबीन दराला आता पोल्ट्री धारकांचा विरोध, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 10:38 AM
Share

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तेच आता प्रत्यक्ष बाजारपेठेत होत आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच (Soybean Prices) सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. आठ दिवसांमध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या दराला (Poultry Breeders) आता पोल्ट्री ब्रीडर्सचा विरोध होत आहे. एवढेच नाही तर पोल्ट्री धारकांनी या संदर्भात थेट पशूसंवर्धन मंत्री यांनाच निवेदन दिले असून सोयाबीनच्या वाढत्या दरात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मात्र, याला शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. देशपातळीवरच सोयाबीनला मागणी असल्याने दरात वाढ होत आहे. शिवाय आवक प्रमाणात राहिली तर अणखीन दर वाढतील असेही संकेत व्यापारी देत आहेत. मात्र, वाढत्या दरामुळे कोंबड्याच्या खाद्यपदार्थाच्या दरावर परिणाम होणार असल्याने पोल्ट्री ब्रीडर्स हे विरोध करीत आहेत.

काय आहेत पोल्ट्री ब्रिडर्सच्या निवेदनामध्ये?

सोयाबीनच्या वाढत्या दराचा परिणाम हा पशूखाद्यांच्या दरावर होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 2950 चा हमीभाव आहे. मात्र, सध्या बाजारात सोयाबीनला 6 हजाराचा दर मिळत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री धारकांचे नुकसान होत आहे. सोयाबीनला जास्तीत जास्त 4 हजाराचा दर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याअनुशंगाने पोल्ट्री ब्रीडर्स यांचा पाठपुरावा सुरु आहे.

शेतकरी संघटनांचा मात्र विरोध कायम

हंगामात प्रथमच सोयाबीनच्या दरात सुधारणा झालेली आहे. सोयाबीनला योग्य दर मिळावा म्हणून शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनची साठवणूक करीत आहे. सोयाबीनच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला आहे. शिवाय मध्यंतरी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. भर पावसामध्ये सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे शेतकऱ्यांनी केलेली आहेत. आता कुठे योग्य प्रमाणात दर मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री ब्रीडर्स ना याचे वावडे का आहे ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिवाय सोयाबीनच्या दरात आता घट झाली तर आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटना ह्या देत आहेत.

सोयाबीनचे दर घटले तर सोयापेंडवरही परिणाम

सोयापेंड आयातीच्या संदर्भात पोल्ट्री ब्रीडर्स असोशिएशने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ऑगस्टमध्ये 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीनची आवक सुरु होताच त्याच्या दरात घट होणार असा अंदाज बांधण्यात आला आणि तो खराही ठरला होता. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. सध्या बाजारात सोयाबीनची आवकच होत नसल्याने दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांनी असाच माल रोखून धरला तर दरात अणखीन वाढ होणार आहे. परिणामी सोयाबीनचे दर वाढले की सोयापेंडचेही दर वाढणार आहेत. त्यामुळेच पोल्ट्री धारक हे सोयाबीनच्या वाढत्या दराला घेऊल परेशान आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचे दर वाढले मात्र आवक कमीच, शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय?

खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..!

गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.