पुणे : येत्या 48 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढलेले दिसून येत आहे, राज्याच्या अनेक भागात सध्या तापमान हे चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे, गेल्या काही दिवसात कोकण आणि गोव्यात तापमानात मोठी वाढ दिसून आली होती, मात्र समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणातली उष्णता कमी झाली, अशी माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुराग कश्यपी यांनी दिली. (Pune Metrological Department predicted heat wave in Vidarbha during next forty Eight hours)