AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओ भाऊ, रोजंदारीने या अन्यथा गुत्ते घ्या पण हरभरा वावरच्या बाहेर काढा..! पीक जोमात काढणीविना कोमात

बघता...बघता खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम टप्प्यात कुठला हरभरा तर काढणीला सुरवातही झाली आहे. यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादन वाढीचीही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण थेट उत्पादनापर्यंत पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागत आहे. यापूर्वी निसर्गाचा लहरीपणा, रोगराईचा प्रादुर्भाव याचा सामना करुन आता कुठे पीक काढणीला आले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे.

ओ भाऊ, रोजंदारीने या अन्यथा गुत्ते घ्या पण हरभरा वावरच्या बाहेर काढा..! पीक जोमात काढणीविना कोमात
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 11:02 AM
Share

नांदेड : बघता…बघता खरीपापाठोपाठ (Rabbi Season) रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम टप्प्यात कुठला हरभरा तर काढणीला सुरवातही झाली आहे. यंदा (Chickpea Crop) हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादन वाढीचीही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण थेट उत्पादनापर्यंत पोहचण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागत आहे. यापूर्वी निसर्गाचा लहरीपणा, रोगराईचा प्रादुर्भाव याचा सामना करुन आता कुठे पीक काढणीला आले आहे. असे असतानाही (Farmer) शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे. आता उन्हाचा तडाका वाढत आहे.त्यामुळे हरभरा कडकून जात असून योग्य वेळी काढणी महत्वाची आहे. पण काढणीला मजूरच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. रोजंदारीमध्ये वाढ करुनही मजूर मिळत नाहीत तर हरभरा काढणीच्या गुत्त्याचे दर गतवर्षीपेक्षा वाढलेले आहेत. त्यामुळे पीक जोमात असले तरी पदरी पडेपर्यंत शेतकऱ्यांच्या जीव टांगणीलाच हे सध्याच्या परस्थितीवरुन लक्षात येत आहे.

म्हणून मजूर टंचाईचा सामना

यंदा रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी या पिकावर भर दिला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील हरभरा पीक काढणीला आहे. पण मजूर मिळत नसल्याने काढणी कामे ही रखडलेली आहेत. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन अशी परस्थिती होती. त्यामुळे शहरातील तरुण हे गावाकडे मार्गस्थ झाले होते. त्यामुळे मजूरांचा प्रश्न मिटलेला होता. पण आता नियमावलीत बदल करण्यात आला असून सर्वकाही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाचे पुन्हा शहराकडे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे मजूरांची समस्या उद्भवत आहेत. एकाच वेळी पिकांची काढणी कामे सुरु झाल्याने नेमके काय करावे या मनस्थितीमध्ये शेतकरी आहे.

दिवसाला 400 रुपये मजूरी

रब्बी अन् खऱीप हंगामातील पीक काढणीच्या प्रसंगी मजूरांच्या रोजंनदारीचे दर वाढतातच. पण यंदा दर वाढूनही मजूर मिळत नाहीत हे विशेष. यंदा हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र काढणी कामे सुरु झाली आहेत. प्रत्येकालाच काढणीवर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून मजूरांनी 400 रुपये अशी मजूरी केली आहे. असे असूनही मजूर कामासाठी मिळत नाहीत. ग्रामीण भागात पीक काढणी हे गुत्तेच म्हणजे एकरी दर ठरवून दिले जाते पण मजूरांची मानसिकताच नसल्याने अंतिम टप्प्यात आता काढणीविना पिकांचे नुकसान होत आहे.

हरभऱ्याच्या वजनात घट

काढणीला आलेल्या पीकाची वेळेत काढणी झाली नाहीतर मात्र, वजनावर त्याचा परिणाम होतो. सध्या ऊसाचीही अशीच अवस्था आहे. शिवाय आता रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. हरभऱ्याच्या काढणीला विलंब झाला तर मात्र, वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे उत्पन घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : पंजाबच्या गायी अन् दर्जेदार दूधावर भर, गावाबाहेर न जाता लाखांच्या घरात उलाढाल! त्यानं करून दाखवलंच!

महावितरणकडून सुविधांपेक्षा अडचणी अधिक, थकबाकी अदा करुनही समस्या कायम, काय आहे बांधावरची स्थिती?

Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा ‘आधार’?

https://www.youtube.com/watch?v=DyCk29KK144

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....