AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे खरीपात झालं नाही ते रब्बीत होईल का ? शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनाची संधी

नैसर्गिक संकट आणि बाजारभावाचे धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच राहिलेली आहे. यंदा तर ही दोन्हा संकटे मिळूनच आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, खरीपात झालेले नुकसान काढण्यासाठी रब्बीत कशा प्रकारे सोयाबीनचे नियोजन केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जे खरीपात झालं नाही ते रब्बीत होईल का ? शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनाची संधी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 01, 2021 | 11:42 AM
Share

लातूर : सोयाबीन हे खरीपातील (Soyabean) मुख्य पीक आहे. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत उत्पादनात वाढ होत नाही. शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत मात्र, (natural crisis) नैसर्गिक संकट आणि बाजारभावाचे धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच राहिलेली आहे. यंदा तर ही दोन्हा संकटे मिळूनच आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, खरीपात झालेले नुकसान काढण्यासाठी (Rabbi Season) रब्बीत कशा प्रकारे सोयाबीनचे नियोजन केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे रब्बीतही सोयाबीन पीक घेतले जाते मात्र, याचे प्रमाण कमी आहे. पण योग्य नियोजन केले तर उत्पादनाता वाढवता येते. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.ॉ

रब्बी हंगामातील प्रमुख पीक हे हरभरा आहे. शिवाय त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ज्वारीची लागवड केली जाते. पण यंदा खरीपात सोयाबीनचे नुकसा झाल्याने रब्बीतही त्याचा पेरा होऊ शकतो. त्यामुळे रब्बीतील सोयाबीनची उत्पादकता वाढवायची असेल तर काय करावे

सोयाबीनसाठी योग्य जमिनक्षेत्र

रब्बी म्हणजेच उन्हाळी सोयाबीसाठी हलक्या प्रतीची जमिन आवश्यक आहे. शिवाय यंदा अधिकचा पाऊस झालेला आहे त्यामुळे ज्या जमिनीत पावसाचे पाणी साचून राहणार असे अशा जमिनीत सोयाबीनची लागवड करु नये. त्यामुले हलक्या प्रतिच्या जमिनीत सोयाबीन घेतले तर उत्पादनात वाढ होणार आहे. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे. तसेच या पिकाला सुर्यप्रकाश कमी असला तरी अशा वातावरणातच वाढ मोठ्या प्रमाणात आहे. उष्ण हवामान सोयाबीनसाठी पोषक राहते. खरीपातील उत्पादकता घटण्याचे कारण म्हणजे अधिकच्या प्रमाणात झालेला पाऊस हेच आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनच्या पाण्याचेही नियोजन करता येते.

कृषी विद्यापीठाने सुचवलेले वाण

मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस 47 (परभणी सोना), एमएयूएस 61 (प्रतिकार), एमएयूएस 61-2 (प्रतिष्ठा), एमएयूएस 71 (समृद्धी), एमएयूएस 81 (शक्ती), एमएयूएस 158, एमएयूएस 162 इ. सुधारित वाणांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय रब्बी हंगामातील सोयाबीनची लागवड ही पाऊस स्थिर झाल्यावरच करणे आवश्यक आहे. सध्या मान्सूनचा पाऊस परतला आहे. अशा परस्थितीमध्ये पेरा केला तर उत्पादनात वाढ होणार आहे.

खत व्यवस्थापन

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही. सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लगेच 10 किलो फेरस सल्फेट 1 एकरात जमिनीतुन द्यावे. सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना गंधक युक्त खतांचा वापर करावा. या खतातून पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. फुलोऱ्यात किंवा शेंगा पोसण्याच्या अवस्थेत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या कालावधीत 15 ते 20 दिवसांच्या फरकाने पाणी दिल्यास शेंगा भरणार आहेत. (Soyabean production can be taken even during rabi season.)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांशी दुजाभाव, 64 साखर कारखानदारांची दिवाळी कडवट

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण

तुम्हाला माहिती आहे का पिकांची अंदाजित उत्पादकता कशी ठरवली जाते? जाणून घ्या

Follow Us
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.