AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers : कुठे बारदाना नाही तर कुठे नाही उपलब्ध जागा, तुमच्या गावी तरी आहेत का शेतकर्‍यांच्या व्यथा, सोयाबीन-कापसाची खरेदी रखडली

Soybean-Cotton Purchasing Stopped : नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता शेतकर्‍यांना सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत आहे. सोयाबीन पीकाला भाव मिळत नसल्याने नाराजी असतानाच आता बारदाना नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Farmers : कुठे बारदाना नाही तर कुठे नाही उपलब्ध जागा, तुमच्या गावी तरी आहेत का शेतकर्‍यांच्या व्यथा, सोयाबीन-कापसाची खरेदी रखडली
सोयाबीन-कापूस उत्पादक हैराण
| Updated on: Jan 04, 2025 | 2:23 PM
Share

शेतकरी सध्या अस्मानीच नाही तर सुलतानी संकटाला सुद्धा तोंड देत आहे. लहरी हवामानाने त्याला जेरीस आणले आहे तर दुसरीकडे प्रशासकीय पांढऱ्या हत्तींनी त्याच्यासमोर संकटांची मालिका सुरू केली आहे. सोयाबीन पीकाला भाव मिळत नसल्याने नाराजी असतानाच आता बारदाना नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे साठवण करायला जागाच नसल्याचे कारण देत कापसाच्या खरेदीला ब्रेक लागला आहे. राज्यातील अनेक भागात असे प्रकार सुरू असल्याने दाद तरी कुणाकडे मागावी असा खडा सवाल शेतकरी विचारत आहेत.

कापसाची खरेदी CII ने केली बंद

जालना येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्राने कापसाच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. कापसाची खरेदी आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. कापसाच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने सीसीआय केंद्राने कापसाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय केंद्राने) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीस पत्र दिले आहे. त्यात कापसाच्य साठवणुकीसाठी जागा नसल्याचे रडगाणे गायले आहे. पुढील आदेशापर्यंत कापसाच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला पुढील आदेशापर्यंत सीसीआय येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणू नये असे आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं आहे.

यवतमाळात शेतकरी आक्रमक

यवतमाळात कापूस खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झाले. रात्री यवतमाळ ते दारव्हा मार्ग काही काळ शेतकर्‍यांनी रोखून धरला होता. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर काही कापूस गाड्या थांबून ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. संबंधित अधिकार्‍यांना खरेदी केंद्रावर पाठवले. खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

बारदाणा नसल्याने सोयबीन शेतकरी नाराज

बुलढाणा जिल्ह्यातील हमी भाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी मागील आठवड्यापासून बारदाना अभावी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खरेदी केंद्रावर न नेता कमी भावात बाजारात विकावा लागत आहे. परिणामी शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात नाफेड अंतर्गत जवळपास ६० खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. याठिकाणी ७० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र बारदाना नसल्याने खरेदी केंद्र बंद पडले आहे. तर शेतकरी अडकले आहेत. शासनाने तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.