AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम, काय आहे कारण?

नैसर्गिक संकटाचा सामना करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नविनच समस्या उभी ठाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्य दरात वाढ होत आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर चोरट्यांनाच होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात तीन ठिकाणी सोयाबीन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम, काय आहे कारण?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 16, 2021 | 11:35 AM
Share

अमरावती : नैसर्गिक संकटाचा सामना करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नविनच समस्या उभी ठाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून (soybean prices increased) सोयाबीनच्य दरात वाढ होत आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर चोरट्यांनाच होताना दिसत आहे. कारण गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात तीन ठिकाणी सोयाबीन (Soybean theft) चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी धुळे येथे कांदा चोरी झाली होती. आता सोयाबीनचे दर वाढताच चोरट्यांनी आपला मोर्चा या पिकाकडे वळविला आहे.

खरिपातील सोयाबीन पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. असे असतानाही काढणी, मळणी करुन अपेक्षित दरासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. मात्र, सोयाबीन विक्रीचा विचार सुरु असतानाच शेतकऱ्याच्या स्वप्नावर चोरट्यांनी पाणी फिरवले आहे. सोयाबीन चोरीच्या दोन घटना ह्या अमरावती जिल्ह्यात तर एक घटना ही बीड जिल्ह्यात घडली आहे.

घरासमोर ठेवलेले सोयाबीन लंपास

अमरावती जिल्ह्यातील सुपलवाडा येथील विलास मारबदे यांनी आपल्या घरासमोर 23 पोते सोयाबीनची साठवणूक केली होती. त्यांना अपेक्षीत दराची प्रतिक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दरात सुधारणा होत असल्याने सोयाबीन विक्रीचा विचार सुरु होता. मात्र, 7 पोत्यातून साडेचार क्विंटल सोयाबीन लंपास करण्यात आले होते. ऐन विक्रीच्या दरम्यानच चोरी झाल्याने त्यांनी केलेली मेहनत आणि सर्वकाही वाया गेले आहे. तब्बल 16 हजार रुपयांचे सोयाबीन चोरीला गेले असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

उभ्या सोयाबीनवरच चोरट्यांचा डल्ला

अमरावती जिल्ह्यातील घुईखेड परिसरातील सोयाबीनची काढणी ही पावसाने लांबली आहे. आता कुठे उघडीप दिल्याने कापणी कामे सुरु होणार होती. पण सोयाबीन कापणीचे काम शेतकऱ्यांच्या आगोदर चोरट्यांनीच केले आहे. आशुतोष गुल्हाने यांच्या शेतातील उभे सोयाबीन चोरट्यांनी काढून लंपास केले आहे. यामध्ये 50 हजाराचे नुकसान झाल्याचे गुल्हाने यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिसकावला

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन पिकावर नैसर्गिक संकट होते. काढणीच्या दरम्यान अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच होते. पण आता उरलेसुरल्या सोयाबीनमधून चार पैसे पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतू, दर वाढत असतानाच चोरट्यांनी सोयाबीनवर डल्ला मारला आहे. दरवर्षी अशा घटना घडतात. पण यावेळी चोरट्यांनीही दराचा अभ्यास करुनच चोरी केली आहे.

बीडमध्ये व्यापाऱ्याची फसवणूक

तालुक्यातील चौसाळा येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी पाठवलेले 15 लाख किमतीच्या सोयाबीन घेऊन ट्रक चालकाने पोबारा केला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौसाळा येथील व्यापारी अंगद नाईकवाडे यांनी 15 लाख किमतीचे सोयाबीन अर्जुन आसाराम कुडके यांच्या ट्रान्स्पोर्टच्यामार्फत धुळे येथे पाठविले होते. मात्र, ट्रक चालक शेख अख्तर शेख याने सोयाबीन धुळे येथे पोहचते केलेच नाही. धारुरच्या एका व्यापाऱ्याच्या मध्यस्तीने हे सोयाबीन परळी तालुक्यातील धर्मापूरी येथेच उतरुन घेतले होते. त्यामुळे आता कुठे सोयाबीनला दर मिळत असताना चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या मजबुती करणासाठी केंद्र सरकारची कृषी पायाभूत सुविधा योजना, नेमकी आहे तरी काय?

कांद्याची लागवड की पेरणी, शेतकऱ्यांसाठी काय आहे सोयीस्कर..?

पावसामुळे पीक पध्दतीमध्येच झाला बदल, भूजल पातळी वाढली अन्…!

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी