AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : वातावरण बदलामुळे पपई काढणीला वेग, शेतकरी प्रतिनिधी व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Nandurbar : वातावरण बदलामुळे पपई काढणीला वेग, शेतकरी प्रतिनिधी व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय
Papaya PlantImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 24, 2023 | 11:58 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून (Agricultural Produce Market Committee) पपईचे दर (Papaya rate) ठरत असतात. शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे दर निश्चित करण्यात आले. पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तापमान 32°c च्या वरती गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. वेगवान काढणी होत असल्याने पपईची आवक वाढली असून वाढत्या आवकमुळे आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागणी कमी झाल्याने व्यापारी आणि शेतकरी यांच्या झालेल्या बैठकीत दरात एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम पपई दरांवर झाला असून पपईच्या दरप्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत. व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरातच्या सीमावरती भागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असते यावर्षी पपईला चांगले तर मिळत असल्याने पुढच्या वर्षी पपईच्या क्षेत्रांमध्ये अजून वाढ होईल असा अंदाज पपई केळी उत्पादक संघाचे अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पपईचे दर ठरवताना शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून ठरत असल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत नसल्याचे चित्र आहे. शहादा बाजार समिती शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्या दर पंधरवड्याला होणाऱ्या बैठकीत बाजाराच्या स्थितीचा विचार करून पपईचे दर कमी जास्त केले जात असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वाद मिटला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान