AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुराडी बंद, मराठवाड्यातील ऊस उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला

यंदाच हंगाम पार पाडण्यामध्ये साखर कारखान्यांसह उसतोड कामगारांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळेच वेळेत गाळप झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान टळले असून यामध्ये कामगारांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली आहे. कामगारांचे हे योगदान लक्षात घेताच साखर कारखाना प्रशासनाकडून उसतोड कामगारांना 15 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिली जाणार आहे.

Sugarcane : पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुराडी बंद, मराठवाड्यातील ऊस उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 12:13 PM
Share

सोलापूर : एका मागून एक पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होत आहेत. शिवाय हे (Sugar Factory) साखर कारखाने आपले उद्दीष्ट पूर्ण करुन हे साखर कारखाने (Sugar Commissioner) साखर आयुक्तांची परवानगी घेऊन गाळप बंद केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील (Sugarcane Sludge) उसाचे गाळप अंतिम टप्प्यात असताना उत्पादकांना दिलासा मिळत आहे पण दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. कारण मे महिन्याचे आठ दिवस उलटले असतानाही तब्बल 50 हजार हेक्टरावर अतिरिक्त उस हा फडातच उभा आहे. तर करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील कमलाभवानी साखर कारखान्याचे गाळप हे बंद झाले आहे. यावर्षीच्या हंगामात 7 लाख 15 हजार टन ऊसाचे गाळप केले आहे.

कारखान्याकडून कामगारांना बोनस

यंदाच हंगाम पार पाडण्यामध्ये साखर कारखान्यांसह उसतोड कामगारांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळेच वेळेत गाळप झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान टळले असून यामध्ये कामगारांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली आहे. कामगारांचे हे योगदान लक्षात घेताच साखर कारखाना प्रशासनाकडून उसतोड कामगारांना 15 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिली जाणार आहे. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात उसतोडीचे झालेले नियोजन, आणि गाळपामधील सातत्य यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला नाही.

मराठवाड्यात यंत्रणा कार्यन्वित

यंदा मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न बिकट झाला आहे. सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा मराठवाड्यातच आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक ना अनेक पर्याय हे समोर आले होते पण अखेर परजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कामी येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का असेना तोड होऊ लागल्याने दिलासा आहे. पण सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परस्थिती नाही तर उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिरिक्त उसाला घेऊन शेतकरी चिंतेत आहेत.

7 लाख 15 हजार टन उसाचे गाळप

करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील कमलाभवानी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 7 लाख 15 हजार टन उसाचे गाळप केले आहे. शिवाय सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखान्याने घेतलेली भूमिका ही महत्वाची ठरली आहे. या सहा महिन्याच्या काळात हे गाळप करण्यात आले असून आता साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखान्याचे गाळप हे बंद करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आता उसतोड कामगार हे परतीच्या वाटेवर आहेत.

रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य.
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान.