AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा

जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ईडी कारवाईच्या विरोधात संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा
साखर कारखाना
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 4:55 PM
Share

सातारा: जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ईडी कारवाईच्या विरोधात संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ईडीनं 1 जुलै रोजी जरंडेश्वर कारखाना म्हणजेच जरंडेश्वर शुगर मिलला सील केलं होतं. जरंडेश्वरवरील कारवाईची राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना सुरु करावी अशी भूमिका घेतली आहे. (Sugarcane Farmers march at Koregaon Magistrate office to restart Jarandeshwar Sugar Mill which sealed by ED)

22 हजार हेक्टरवरील ऊसाची नोंद

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. ईडीच्या जिल्ह्यातील कोरेगाव, वाई, खंडाळा आणि खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची नोंद या कारखान्यामध्ये झाली असून येवढ्या उसाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ईडी कारवाईमुळं संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालय मोर्चा काढला. या मोर्चात वाई, कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकरी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. जरंडेश्वर शुगर कारखान्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत हा सर्व प्रकार राजकीय सूडबुद्धीने केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन जरंडेश्वर कारखाना पूर्ववत सुरू ठेवावा या मागणीचे निवेदन कोरेगाव तहसीलदारांना देण्यात आले.

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते. सीआयडी, एसीबीनं चौकशी केली त्यामध्ये काहीही समोर आलं नाही. ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरु आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात आरोप करण्यात आले होते पण त्यासंदर्भात पॉझिटिव्ह निकाल आले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

इतर बातम्या:

Jarandeshwar Sugar Mill | जरंडेश्वर साखर कारखाना सील, अजित पवार ईडीच्या रडारवर? नेमकं प्रकरण काय?

मामाच्या साखर कारखान्यावर ED ची कारवाई; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

(Sugarcane Farmers march at Koregaon Magistrate office to restart Jarandeshwar Sugar Mill which sealed by ED)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.