AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada : उन्हाळी हंगामातील पिकांवर तिहेरी संकट, उत्पादनात घटणार की शेतकऱ्यांना प्रयत्नांना यश मिळणार

मराठवाड्यात उन्हाळी हंगामात भुईमूग, सोयाबीन आणि राजमा ही पिके वावरात आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने अजून महिनाभर पाणी कसे टिकवून वापरावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर महावितरणवरच या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.

Marathwada : उन्हाळी हंगामातील पिकांवर तिहेरी संकट, उत्पादनात घटणार की शेतकऱ्यांना प्रयत्नांना यश मिळणार
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 02, 2022 | 3:14 PM
Share

लातूर : वाटलं होत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने (Summer Season) उन्हाळी हंगामात सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे होईल, पण संकटाशिवाय एक पीक पदरात पडत नाही. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी उन्हाळी हंगामात शेतकरी जोमाने कामाला लागला. (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Production Increase) उत्पादन वाढण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता पण आता अंतिम टप्प्यात तिहेरी संकट या पिकांवर ओढावले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी कसा मार्ग काढणार हे पहावे लागणार आहे. खरिपाप्रमाणेच उन्हाळी हंगामात नुकासनीची परस्थिती निर्माण झाली आहे पण खरिपात अधिकच्या पावसामुळे नुकसान झाले तर आता वाढत्या उन्हाच्या झळामुळे पिके करपू लागली आहेत. उन्हाळी पिकांना अजूनही तीन आठवड्याचा कालावधी आहे. या दरम्यानच्या काळात पीक जोपासणेच महत्वाचे ठरणार आहेत.

शेतकऱ्यांसमोर कोणती संकटे?

मराठवाड्यात उन्हाळी हंगामात भुईमूग, सोयाबीन आणि राजमा ही पिके वावरात आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने अजून महिनाभर पाणी कसे टिकवून वापरावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर महावितरणवरच या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या कृषी पंपासाठी 7 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्याच अनुशंगाने पाणी देण्याची कामे उरकून घ्यावी लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिके अडचणीत आहेत.

सोयाबीनला अधिकचे पाणी

उन्हाळी हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे. सोयाबीन हे पावसाळी म्हणजेच खरिपातील पीक आहे. त्यामुळे या पिकाला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा होता पण वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. आता उर्वरीत काळात पिके जोपासायची कशी हा प्रश्न आहे. सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे. अशातच पाणी कमी पडले तर थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.

शेतकऱ्यांकडे पर्याय काय?

उशिरा पेर झालेल्या सोयाबीनला परिपक्व होण्यासाठी अजून 3 आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पाण्याचे योग्य नियोजन केले तरी उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय पिकांना पाणी देताना रात्रीच्या वेळी दिले तर कमी पाणी लागणार आहे. शेंगा पोसल्याशिवाय पाणी तोडू नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.