.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यापाऱ्यांची मनमानी, मग संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लिलावाचं मार्केट गेट…

बाजार समितीचा रस्ता खराब असल्याने दुसऱ्या बाजार समितीत माल नेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) रोष पहायला मिळाला. अखेर मार्केट कमिटीकडून रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले

व्यापाऱ्यांची मनमानी, मग संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लिलावाचं मार्केट गेट...
maharashtra farmerImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 10, 2023 | 10:47 AM
Share

अहमदनगर : कोपरगाव (Kopargaon) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) भाजीपाला लिलावात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापारी मनमानी पद्धतीने लिलाव करत असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला कमी भाव आणि व्यापाऱ्यांनी आणलेल्या मालास अधिक भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत घोषणाबाजी केली. मार्केट कमिटीचे गेट बंद करून गेट समोर आपली वाहने आडवी लावत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बाजार समितीचा रस्ता खराब असल्याने दुसऱ्या बाजार समितीत माल नेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) रोष पहायला मिळाला. अखेर मार्केट कमिटीकडून रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले, तर व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आणि बाजार समितीच्या प्रशासकांमध्ये आज बैठक पार पडणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याने कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र आता कापूस विकण्यासाठी पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. कापूस घरात साठवणूक करून ठेवला असल्याने कापसाची कॉलिटी खराब झाली असून त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठं आर्थिक नुकसान होत चाललं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालो तर कापसाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक आव्हान उभे राहिला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन कापसाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक 1 लाख 12 हजार शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशाचा मोठा आधार झाला आहे. जिल्ह्यातील 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असल्यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभ मिळाला आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबीयांना 2 हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रतिवर्ष लाभ मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या पेरणीसाठी काही प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर