AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, वाढत्या महाबीज बियाणे दराचे काय ? माजी कृषीमंत्र्यांचा ठाकरे सरकारला सवाल

यंदा बिजोत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही अशी स्थिती होती. मात्र, अधिकच्या तापमनामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला होता. त्यामुळे हे बियाणे आता वापरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे पुन्हा महाबीजला महत्व निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन दरवाढ केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

Kharif Season : सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, वाढत्या महाबीज बियाणे दराचे काय ? माजी कृषीमंत्र्यांचा ठाकरे सरकारला सवाल
महाबीज कंपनी
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 1:17 PM
Share

अमरावती:  (Kharif Season) खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच नवनवीन बाबी समोर येऊ लागल्या आहेत. (Chemical Fertilizer) रासायनिक खतांवर अनुदान दिले जाणार असल्याने हे दर नियंत्रणात राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे महाबीजने (Soybean Seed) सोयाबीन बियाणाच्या प्रति बॅगमागे 2 हजार रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वकाही पोषक असताना आता शेतकऱ्यांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे. यावरुन माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. सरकारच शेतऱ्यांच्या समस्या वाढवत आहे. राज्यात 46 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या दरात वाढ करुन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा घणाघात बोंडे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

महाबीजच्या बियाणांमध्ये 2 हजार रुपयांची वाढ

यंदा बिजोत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही अशी स्थिती होती. मात्र, अधिकच्या तापमनामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला होता. त्यामुळे हे बियाणे आता वापरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे पुन्हा महाबीजला महत्व निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन दरवाढ केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. 2 हजार रुपयांची वाढ म्हणजेच 2 हजार 200 रुपयांना असणारी सोयाबीनची 30 किलोची बॅग ही आता 4 हजार 200 रुपयांना मिळणार आहे.

ठाकरे सरकार शेतकऱ्यांविरोधात

एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. परंतू, प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच आहे. शेतकरी अडचणीत असताना आता बियाणे दरवाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम सोयाबीन क्षेत्रावर देखील होऊ शकतो. यंदा सर्वकाही पोषक असताना केवळ सरकारच्या भूमिकेमुळे खरिपातील सोयाबीन उत्पादनावर परिणाम होईल. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असतानाच राज्य सरकारकडून लूट केली जात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हे सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही असे बोंडे यांनी सांगितले आहे.

आता सर्वच बियाणे कंपन्या दर वाढवतील

महाबीज कंपनीकडील बियाणांचा वापर अधिकतर शेतकरी करतात. या कंपनीच्या सोयाबीन बियाणे दरात एका पिशवीमागे 2 हजार रुपयांची वाढ कऱण्यात आली आहे. त्यामुळे आता इतर बियाणे कंपन्यांही दर वाढ करतील अशी शंकाही अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे रासायनिक खतावर अनुदान देऊन केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देत असताना मात्र, राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय न घेता शेतकऱ्यांचे नुकसान होईल असेच धोरण राज्य सरकारचे राहिले असल्याचे बोंडे यांनी सांगितले आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.