AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Crop Insurance: 2020 चा पीकविमा मंजूर, विमा कंपन्यांनी अंमलबजावणी केली नाही तर जबाबदारी कुणाची?

2020 सालचा खरीप हंगामातील रखडलेला पिकविमा देण्याचा निर्णय हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी असू शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे विमा रकमेची मागणी करीत शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन, मोर्चे ही काढले होते. अखेर प्रश्न मार्गी लागला नसल्याने शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याबाबत गेल्या 2 वर्षापासून सुनावणीची प्रक्रिया सुरु होते.

Kharif Crop Insurance: 2020 चा पीकविमा मंजूर, विमा कंपन्यांनी अंमलबजावणी केली नाही तर जबाबदारी कुणाची?
पीक विमा योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 08, 2022 | 1:44 PM
Share

उस्मानाबाद : अखेर (Farmer) शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. गेल्या 2 वर्षापासून रखडलेला (Kharif Crop Insurance) खरीप हंगामातील पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना 6 आठवड्यामध्ये वितरीत करण्याचे आदेश (Aurangabad Court) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सन 2020 चा खरिपातील पीक विमा देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ केली होती.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर विमा कंपनीचे प्रतिनीधी, शेतकरी आणि राज्य सराकारमधील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकूण अखेर 2020 च्या खरिपातील पिक विमा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पण कोर्टाने एक महत्वाचा निर्णय यामध्ये दिला आहे की, जर विमा कंपनन्यांनी 6 आठवड्यात अंमलबजावणी केली नाही तर मात्र, ही जबाबदारी राज्य सरकारची राहणार आहे.

3 लाख 50 हजार शेतकऱ्यांसाठी 510 कोटी रुपये

2020 सालचा खरीप हंगामातील रखडलेला पिकविमा देण्याचा निर्णय हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी असू शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे विमा रकमेची मागणी करीत शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन, मोर्चे ही काढले होते. अखेर प्रश्न मार्गी लागला नसल्याने शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याबाबत गेल्या 2 वर्षापासून सुनावणीची प्रक्रिया सुरु होते. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले असून आता 510 कोटीचे वितरण केवळ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी होणार आहे.

नेमकी अडचण काय झाली होती?

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आतमध्ये त्या पिकांच्या नुकसानभऱपाईसाठी दावा करणे बंधनकारक होते. हे नियम विमा कंपन्यांनी लागू केले आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आपला नुकसानीचा दावाच केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे मदतीविनाच होते. मात्र, आता औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर 6 महिन्यात पैसे वितरीत करण्याचे आदेश आहेत. आता विमा कंपनी काय भूमिका घेणार हेच सर्वात महत्वाचे आहे. केवळ नुकासनीची ऑनलाईन तक्रार न आल्यास थेट विमाच नाही ही भूमिका योग्य नसल्याचे कोर्टाने आता असे आदेश दिले होते.

विमा कंपन्यांनी हात झटकले तर…

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाबरोबर आगामी 6 आठवड्यात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. शिवाय विमा कंपन्याकडून टाळाटाळ केल्यास या नुकसान भरपाईला जबाबदार हे राज्य सरकार राहणार असल्याचे त्या निर्णयात नमूद केले आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत