AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Crop Insurance: 2020 चा पीकविमा मंजूर, विमा कंपन्यांनी अंमलबजावणी केली नाही तर जबाबदारी कुणाची?

2020 सालचा खरीप हंगामातील रखडलेला पिकविमा देण्याचा निर्णय हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी असू शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे विमा रकमेची मागणी करीत शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन, मोर्चे ही काढले होते. अखेर प्रश्न मार्गी लागला नसल्याने शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याबाबत गेल्या 2 वर्षापासून सुनावणीची प्रक्रिया सुरु होते.

Kharif Crop Insurance: 2020 चा पीकविमा मंजूर, विमा कंपन्यांनी अंमलबजावणी केली नाही तर जबाबदारी कुणाची?
पीक विमा योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 08, 2022 | 1:44 PM
Share

उस्मानाबाद : अखेर (Farmer) शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. गेल्या 2 वर्षापासून रखडलेला (Kharif Crop Insurance) खरीप हंगामातील पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना 6 आठवड्यामध्ये वितरीत करण्याचे आदेश (Aurangabad Court) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सन 2020 चा खरिपातील पीक विमा देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ केली होती.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर विमा कंपनीचे प्रतिनीधी, शेतकरी आणि राज्य सराकारमधील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकूण अखेर 2020 च्या खरिपातील पिक विमा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पण कोर्टाने एक महत्वाचा निर्णय यामध्ये दिला आहे की, जर विमा कंपनन्यांनी 6 आठवड्यात अंमलबजावणी केली नाही तर मात्र, ही जबाबदारी राज्य सरकारची राहणार आहे.

3 लाख 50 हजार शेतकऱ्यांसाठी 510 कोटी रुपये

2020 सालचा खरीप हंगामातील रखडलेला पिकविमा देण्याचा निर्णय हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी असू शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे विमा रकमेची मागणी करीत शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन, मोर्चे ही काढले होते. अखेर प्रश्न मार्गी लागला नसल्याने शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याबाबत गेल्या 2 वर्षापासून सुनावणीची प्रक्रिया सुरु होते. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले असून आता 510 कोटीचे वितरण केवळ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी होणार आहे.

नेमकी अडचण काय झाली होती?

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आतमध्ये त्या पिकांच्या नुकसानभऱपाईसाठी दावा करणे बंधनकारक होते. हे नियम विमा कंपन्यांनी लागू केले आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आपला नुकसानीचा दावाच केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे मदतीविनाच होते. मात्र, आता औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर 6 महिन्यात पैसे वितरीत करण्याचे आदेश आहेत. आता विमा कंपनी काय भूमिका घेणार हेच सर्वात महत्वाचे आहे. केवळ नुकासनीची ऑनलाईन तक्रार न आल्यास थेट विमाच नाही ही भूमिका योग्य नसल्याचे कोर्टाने आता असे आदेश दिले होते.

विमा कंपन्यांनी हात झटकले तर…

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाबरोबर आगामी 6 आठवड्यात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. शिवाय विमा कंपन्याकडून टाळाटाळ केल्यास या नुकसान भरपाईला जबाबदार हे राज्य सरकार राहणार असल्याचे त्या निर्णयात नमूद केले आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?