AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांनो ‘या’ गोष्टींची अंमलबजावणी हाच पर्याय

दरवर्षी सोयाबीनची आवक घटली तर दर वाढतात ही परस्थिती असते. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. आवक घटूनही दर हे दिवसेंदिवस घटत आहे. 8800 वर गेलेले सोयाबीन थेट 5600 वर येऊन ठेपलेले आहे. (Farmer) अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याची आज आपण माहिती घेणार आहोत...

सोयाबीनच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांनो 'या' गोष्टींची अंमलबजावणी हाच पर्याय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 12:37 PM
Share

लातूर : एकीकडे सोयाबीनची आवक घटत आहे तर दुसरीकडे दर घटत आहेत. ()Soyabean) शिवाय 50 टक्क्याहून अधिकच्या क्षेत्रावरील सोयाबीन हे पावसाच्या पाण्यात आहे. दरवर्षी सोयाबीनची आवक घटली तर दर वाढतात ही परस्थिती असते. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. आवक घटूनही दर हे दिवसेंदिवस घटत आहे. 8800 वर गेलेले सोयाबीन थेट 5600 वर येऊन ठेपलेले आहे. (Farmer) अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याची आज आपण माहिती घेणार आहोत…

खरीपातील नगदी पिक असलेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांची आर्थिक मदार असते. यंदा मात्र, सर्वकाही शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गोष्टी घडत आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली होती तर पीक काढणीला आले असतानाच मराठवाड्यासह राज्यात पावसाचा कहर झाला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक अजूनही पाण्यात आहे.

मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन सुस्थितीती आहे. सध्या उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीन काढणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे काढणीनंतर लागलीच सोयाबीनची विक्री करावी की नाही…अधिकच्या दराची प्रतिक्षा करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा..तसेत वाढीव दरासाठी शेतकऱ्यामकडे काय पर्याय आहेत याबाबत कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी मार्गदर्शन केले आहे…

1)* पावसामुळे खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान हे झालेले आहे. विशेष: पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला तर कोंभ फुटलेले आहे. त्यामुळे आशा सोयाबीनची काढणी झाली की लगेच विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा साठवणूक केलेल्या सोयाबीन हे कुजणार आहे. त्यामुळे मिळेल त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

2)* ज्या सोयाबीनची काढणी ही पावसाच्या अगोदर झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीला हरकत नाही. जे सोयाबीन डागाळलेले नाही त्याची साठवणूक केली तरी त्याच्या गुणवत्तेवर काही परिणाम हा होणार नाही. शिवाय भविष्यात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत आहेत. त्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

3)* पीक साठवूण ठेवण्याची शेतकऱ्यांची क्षमता ही अधिक नसते. त्यामुळे पावसात भिजलेल्या सोयाबीनला मिळेल त्या दरात विक्री करणे हेच शेतकऱ्यांच्या हीताचे राहणार आहे.

4)*वेअर हाऊस एक उत्तम पर्याय…शेती मालाची साठवणूक करण्यासाठी आता वेअर हाऊस उभारण्यात आलेली आहेत. शेतीमालाच्या साठवणूकीवर सध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम ही अदा केली जाते. त्यामुळे योग्य वेळी शेतीमालाला योग्य दर मिळणार आहे. तर धान्याचे नुकसानही होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बुलढाणा अर्बनचे वेअर हाऊस आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

5)*कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वेअर हाऊसची उभारणी करण्यात आलेली आहे. शिवाय येथे शेतीमालाची साठवणूक केल्यावर या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळते. आणि योग्य भाव झाल्यात त्याची विक्री केली जाते. यामुळे मिळालेल्या पैशाच्या जोरावर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे.

6) *सोयाबीन हे पावसाने किंवा अन्य कारणाने काळवंडले असेल तर त्याची साठवणूक करु नये. मिळेल त्या दरात त्याची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

बाजारपेठेत सोयाबीनचे दर

लातूरची बाजारपेठ ही सोयाबीनसाठी प्रसिध्द आहे. पण यंदा नैसर्गिक संकट आणि केंद्र सरकारचे निर्णय यामुळे आवक ही दिवसेंदिवस घटत आहे. 11500 वर गेलेले सोयाबीन थेट 5800 वर येऊन पोहचले आहे. शिवाय पावसाने उघडीप दिल्याने शेती कामे सुरु झाली असून त्याचा देखील परिणाम आयातीवर झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बालाजी जाधव यांनी सांगिलते आहे. भविष्यात आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावरच होणार आहे. (The fall in soyabean prices, the options that farmers have, )

संबंधित बातम्या ;

कथा साखर कारखान्याची, व्यथा शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’ रकमेची

वेळप्रसंगी निकष बदला, पण नुकसानची नोंद घ्या : पालकमंत्री देशमुख

राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.