AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये होणार अमुलाग्र बदल, पेरणीपासून बाजारपेठ पर्यंत माहिती होणार उपलब्ध

शेतीचे ऊत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पाच खासगी कंपन्यांशी करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे.

नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये होणार अमुलाग्र बदल, पेरणीपासून बाजारपेठ पर्यंत माहिती होणार उपलब्ध
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 9:04 PM
Share

मुंबई : शेतीचे ऊत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पाच खासगी कंपन्यांशी करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे.

केवळ ऊत्पन्नच नाही तर उत्पादनांचे संरक्षणही यातून होईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग राबविण्यास शेतकरी सक्षम होणार आहे. पेरणीसाठी कोणती वाण चांगली असेल आणि कोणत्या पद्धतीने उत्पादन वाढेल, याची सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतीच्या आधुनिकीकरणात नवीन तंत्रज्ञानाच उपयोगी ठरणार आहे. यानुसारच शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील असा दावा कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला. मंगळवारी कृषी भवन येथे झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी कार्यक्रमा दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. हे सामंजस्य करार सिस्को, निन्जाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड यासह प्रायोगिक प्रकल्पांसाठी करण्यात आले आहेत.

असे असणार डिजीटल कृषी मिशन

सरकारने आर्टिफिशीअल, इंटेलिजन्स, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग, जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट इत्यादी वापरण्यासाठी 2021ते 2025 कालावधी लक्षात घेऊन हे डिजिटल कृषी मिशन सुरू करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राला बदलण्यासाठी पर्यावरणाभिमुख दृष्टिकोन आणि डिजिटल इकोसिस्टमचा अवलंब आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनचे महत्त्व ओळखून, विभाग एक संस्थागत शेतकरी डेटाबेस तयार करत आहेत. शेतीसाठी डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यासाठी या डेटाबेसच्या आसपास विविध सेवा विकसित करत आहे.

अशा प्रकारे होतेय शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन

शेतकऱ्यांचा संस्थात्मक डेटाबेस देशभरातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींशी जोडला जाणार आहे, तसेच एक वेगळा शेतकरी आयडी तयार केला जाणार आहे. या एकात्मिक डेटाबेस अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे सर्व लाभ आणि सहाय्य संबंधित माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी ठेवली जाईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने त्या माहितीचा स्रोत बनू शकते. आत्तापर्यंत, सुमारे 5.5 कोटी शेतकऱ्यांच्या तपशीलांसह डेटाबेस तयार झाले आहेत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.