AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला, केळी बागायतदारही चिंतेत, भाजीपाला महागला

केळी बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्यामुळे केळी बागायतदारही चिंतेत सापडले आहेत. त्याचबरोबर इतर पिकांची सुद्धा तशीचं अवस्था आहे. केळीच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला, केळी बागायतदारही चिंतेत, भाजीपाला महागला
banana cropImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 19, 2023 | 10:47 AM
Share

महाराष्ट्र : आठवड्यापूर्वी एकाच दिवसात 700 रुपये प्रतिक्विंटलने केळीच्या (Banana) भावात वाढ झाली होती. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. मात्र,चार दिवसांपूर्वी एकाच दिवसात 400 रुपयांची घसरण झाली आहे. केळीच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली असून शेतकरी (farmer) चिंतेत सापडला आहे. दिवसभरात अजून-मधून ढगाळ वातावरण उष्णतेचे प्रमाण झाल्यामुळे केळीच्या मालाची परिपक्वता उशिराने झाली आहे. परिणामी केळीची (banana cultivation) आवक थांबली असल्यामुळे बाजारभावातही उसळी होती. ही वार्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली. मात्र, मे महिन्यात ४४ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानाने तब्बल आठ ते दहा दिवस सातत्य राखल्याने केळी मालाचे मोठ नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

कोथिंबीर ७० रुपये किलो

गेल्या पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या उत्पन्नात घट निर्माण झाली आहे. उत्पन्न कमी व मागणी अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. ३० ते ४० रुपये किलोवर असलेली मेथी, पालक व पोकळा आता ६० ते ६५ रुपये किलोवर पोचली आहे. गेल्या पंधरवड्यात १०० ते ११० रुपये किलोवर असलेली गवार शेंग सध्या ६० रुपये किलोने विक्री होत आहे. तर या भाववाढमुळे महिलांच्या किचनचेही बजेट कोलमडले आहे.

शेळी पालन करणाऱ्यांना सुखाचे दिवस

नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने चाऱ्याची टंचाई जाणवतेय, अश्या स्थितीत मागणी कायम असल्याने बकऱ्यांच्या भावात मोठी उसळी आलीय. त्यामुळे शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे देऊन बकऱ्यांची खरेदी सध्या सुरू आहे. ऐन लग्नसराईत शेळी पालन करणाऱ्या ग्रामीण शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बकऱ्याला अधिकची किंमत मिळत असल्याने शेळी पालन करणारे सुखावले आहेत.

खरीपपूर्व हंगामाला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतात तणांची वाढ अधिक प्रमाणात झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी तयारीला लागला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचला असूनसुद्धा जीवाचा आटापिटा करत बळीराजा प्रखर तप्त उन्हात मशागत करत आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट सांगितली असली, तरी खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी उन्हाचे चटके खात मशागत करत आहे. शेतकऱ्यांची दिनचर्या पहाटे चार वाजतापासून सुरू होते. सकाळी उठल्यावर सर्जाराजाला चारा मांडणे, सहा वाजता शेतात वखरणीस सुरुवात करतो, नऊ वाजल्यापासून शेतकऱ्याला उन्हाचे चटके खात तो बारा वाजेपर्यंत मशागत करतो. नंतर परत दुपारी तीन वाजतापासून ते सहा वाजेपर्यंत वखराच्या पाळीने प्रखर उन्हात उष्णतेची लाट अंगावर घेत मशागत करतो. शेतात धसकटे वेचणे, काडी कचरा साफ करून पेटविणे, वखरणे इत्यादी कामे सध्या या उष्णतेत सुरू आहे. पाऊस पडण्यापूर्वी रानातील तण साफ केले नाही, नंतर मशागत हवी तशी होत नसल्यामुळे 42 अंश तापमान अंगावर घेऊन मे महिन्यातच संपूर्ण कामे पूर्ण करतात. जेणेकरून पाऊस पडल्यानंतरचा हंगाम लवकर करता यावा व पेरणी वेळेवर करता यावी, असे नियोजन बळीराजा करत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.