AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? ‘या’ कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून

महासंघाच्या आहे त्या गोदामामध्ये यापूर्वीच खरेदी केलेल्या शेतीमालाचा साठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माल हलविण्यात आलेला नाही. आणि हेच कारण आहे येथील खरेदी केंद्र बंद असण्याचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने मका आणि ज्वारीची विक्री करावी लागत आहे.

काय सांगता? 'या' कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 8:00 AM
Share

जळगाव : ज्या पध्दतीने सरकारकडून शेतकरी हीताच्या घोषणा होतात त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी या अनुशंगाने (Marketing Federation) पणन महासंघातर्फे खरेदी-केंद्र सुरु केली जातात. अगदी त्याच पध्दतीने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे  खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळालेली आहे. पण महासंघाच्या आहे त्या  (warehouse) गोदामामध्ये यापूर्वीच खरेदी केलेल्या (Agricultural Produce) शेतीमालाचा साठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माल हलविण्यात आलेला नाही. आणि हेच कारण आहे येथील खरेदी केंद्र बंद असण्याचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने मका आणि ज्वारीची विक्री करावी लागत आहे. सध्या या तालुक्यात एकही खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी म्हणतेल त्याच दरामध्ये विक्री केली जाच असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

नोंदणी सुरु खरेदी बंद

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतीमाल केंद्रावर आणण्यापूर्वीच त्याची नोंद घेतली जाते. यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार याकरिता 7/12 उतारा, 8 अ, पिकपेरा आणि बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. अशा पध्दतीने रावेर येथील खरेदी संघावर ज्वारीसाठी 256 तर मक्यासाठी 323 शेतकऱ्यांनी नोंद केलेले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष खरेदी केंद्र केव्हा सुरु होणार याची.

कारभाराबाबत शेतकरी संतप्त

खरेदी केंद्र सुरु करण्यापुर्वीच गोदामाची सोय करणे अपेक्षित होते. मात्र, महसूलच्या पुरवठा विभागाचे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही सरकारी सोय असताना देखील कमी किंमतीमध्ये शेतीमाल विकण्याची नामुष्की आलेली आहे. गोदामाला जागाच नसल्याने शेतीमाल पडून अशी पहिलीच घटना झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन नेमका काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

वखार महामंडाळाच्या दोन्ही गोदामात आहे तरी काय?

रावेरी तालुक्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या दोन्ही गोदामात खरेदी केलेल्या हरभऱ्याची साठवणूक केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोदामातील माल हलवण्यातच आलेला नाही. त्यामुळेच सध्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आठवड्याभरात गोदामाची सोय केली जाणार असल्याचे येथील पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.