AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो. थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे सांगली जिल्ह्यात थेट द्राक्ष काढणीलाच ब्रेक बसला आहे.

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला 'ब्रेक'
आता वातावरण निवाळल्याने द्राक्ष निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 3:07 PM
Share

सांगली : शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते (Untimely Rain) अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो. थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे (Sangli District) सांगली जिल्ह्यात थेट द्राक्ष काढणीलाच ब्रेक बसला आहे. (Grape Crop) द्राक्ष बागा ह्या गेल्या तीन महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत, मात्र, वर्षभर केलेला खर्च आणि आता पीक पदरात पडतानाच माघार कशी घ्यायची म्हणून शेतकऱ्यांनी खर्चाचा विचार न करता बागा जोपासण्यावर भर दिला पण आता हंगाम सुरु झाला तरी संकटाची मालिका ही सुरुच आहे. वाढलेल्या गारट्यामुळे द्राक्ष काढणी करताना मण्यांना तडा जात आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून द्राक्ष काढणी रखडलेली आहे.

नेमके काय नुकसान होते?

अगोदरच अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होणार आहे. याची माहिती शेतकऱ्यांना देखील आहे. त्यामुळे आता अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी काळजी घेत आहेत. वाढलेल्या गारठ्यामुळे मण्यांना तडे जात असल्याने बागांमध्येच शेकोट्या पेटवण्याची नामुष्की ओढावली होती. आता अशा अवस्थेत जर द्राक्षाची काढणी केली तर बाजारपेठेत जाईपर्यंत द्राक्ष खराब होतात. परिणामी कमी दर मिळेल म्हणून काढणी ही लांबणीवार पडणार आहे.

व्यापारी दाखल मात्र, वेटींवरच

नाशिक पाठोपाठ सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय द्राक्ष खरेदीसाठी दक्षिण भारतामधून व्यापारी हे जिल्ह्यातही दाखल झाले आहेत. मात्र, वाढलेल्या गारट्यामुळे द्राक्षांची काढणी शक्य नाही म्हणून दर ठरवूनही पुढची प्रक्रिया ही करता येत नाही. अगोदरच हंगाम सुरु होण्यास विलंब झाला आहे. असे असताना काढणीच्या दरम्यानही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अजून काही दिवस अशीच परस्थिती राहिली तर दरावरही त्याचा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सर्वकाही नुकसानीचेच, निसर्गामुळे यंदा द्राक्षावर संक्रात

दरवर्षी नुकसान होत नाही असे नाही पण त्याची तीव्रता ही कमी असते. यंदा गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी विविध समस्यांना सामोरे जात आहे. आता कुठे सर्वकाही सुरळीत होत असताना दरवरर्षी पोषक ठरणारी यंदा मारक ठरत आहे. अशा अवस्थेत जर काढणी सुरु ठेवली तर चार पैसे मिळणार आहेत त्यावरही संक्रात येईल म्हणून काढणी बंद असल्याचे द्राक्ष बागायत संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान

Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय

Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.