AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : या पिकामुळे बारामतीचा शेतकरी बनला श्रीमंत, वर्षभरात 15 लाखांहून अधिक कमाई

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन लाखो रुपयाची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक करीत आहेत.

Agriculture News : या पिकामुळे बारामतीचा शेतकरी बनला श्रीमंत, वर्षभरात 15 लाखांहून अधिक कमाई
Ginger farmingImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 1:21 PM
Share

बारामती : आल्याची शेती केल्यामुळे एक बारामतीचा (Baramati) शेतकरी (Farmer) मालामाल झाला आहे. बारामती निंबूत गावाचे रहिवासी संभाजीराव काकडे असं त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांनी दीड एकरात आल्याच्या पीकाची लागवड (Ginger farming) केली होती. पहिल्यावर्षी त्यांचं मोठ नुकसान झालं. पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यावर्षी चांगली मेहनत आणि काळजी घेतल्यामुळे १५ लाख रुपयांचा त्यांना फायदा झाला आहे.

निवृत्तीनंतर केली उत्तम शेती

शेतकरी संभाजीराव काकडे सोमेश्वर महाविद्यालयात कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी ते तिथून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी असलेल्या शेतीकडं अधिक लक्ष दिलं. त्याचबरोबर शेताआत आल्याची लागवड केली. पहिल्यावर्षी त्यांना मोठा फटका सहन करावा लागला. १० हजार रुपयांनी असा प्रति टनाला भाव मिळाला. परंतु पहिल्या प्रयत्नात त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यांदा त्यांनी पिकाची अधिक काळजी घेतली. त्यामुळे यावर्षी त्यांच्या आल्याच्या पिकाला ६६ हजार रुपये प्रति टन पैसे मिळाले आहेत.

१५ लाखापेक्षा अधिक फायदा

संभाजीराव यांनी सांगितले की, पुर्वी तिथं आम्ही उसाची शेती करीत होतो. पहिल्यावर्षी त्यांना एका एकराला तीन लाख रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यावर्षी सहा लाख रुपये खर्चे करुन आल्याची लागवड केली. अधिक मेहनत आणि पिकांची काळजी घेतल्यामुळे त्यांनी आल्याचं तीन टनाचं उत्पादन काढलं. प्रत्येक टनाला त्यांना ६६ हजार रुपये मिळाले. त्यांना १९ लाख रुपये मिळाले आहेत. शेतीसाठी झालेला सगळा खर्चे काढून त्यांना १५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

काकडे परिवाराने शेती करीत असताना पीक चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. त्याचबरोबर यावर्षी त्यांनी फक्त १० टक्के रासायनिक खते वापरली आहेत. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी त्यांनी 40 ट्रॉली शेणखत, 8 ट्रॉली राख, 300 पोती शेणखत, 8 ट्रॉली प्रेस मड आणि त्यात सोडलेले जिवाणू गोळा केले. तो अडीच महिने कुजला. आले पिकाला खताचा मोठा फायदा झाला आहे. पुढील वर्षी शंभर टक्के सेंद्रिय खताचा वापर करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.