AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, पिकांसह आंबा, फळ पिकांचे नुकसान होणार आहे. धडगाव परिसरात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल
nandurbar farmer (1)Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 21, 2023 | 11:05 AM
Share

नंदुरबार : नंदुरबार (Nandurabar) जिल्ह्यात सलग सात दिवसापासून अवकाळी पाऊस (unseasonal rain) वादळी वाऱ्यांसह गारपीट सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीसाठी आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिके शेतात आडवी झाली आहेत. शेतीत केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर (Farmer) निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील ओल तशीच असल्याने आडवी झालेली पिके जागेवरच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावली असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा अक्कलकुवा शहादा आणि धडगाव जोरदार पाऊस होता आहे. जिल्ह्यात अजून काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या संप मिटला असून लवकरच पंचनामे पूर्ण होतील अशी अपेक्षा शेतकरी बांधव करू लागले आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात सरळ सलग आठवडाभर अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहर आणि तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची हजरी धडगाव येथे सोमवारी आठवडा बाजार भरत असल्याने अवकाळी पावसामुळे आठवडे बाजारात लागलेल्या दुकानांच्या चांगलाच नुकसान झाला आहे. तर अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ चांगलीचं उडाली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, पिकांसह आंबा, फळ पिकांचे नुकसान होणार आहे. धडगाव परिसरात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे. जळगाव तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना अवकाळी पावसामुळे पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आजही शेकडो आदिवासी महिला डाकीण प्रथेला बळी पडत आहेत. या आघोरी प्रथेमुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यातील सरी या गावात डकीन प्रथर्वर जनजागृती पोस्टर प्रदर्शन करण्यात आली. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाकीण महिलांना जादूटोणा जादूटोण्याचे घटना घडत आहेत. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील लोकांची समजूत काढण्यात आली असून डकीन ही प्रथा नाही आहे फक्त आपला भ्रम आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.