AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseosonal Rain : कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान, जाणून घ्या महाराष्ट्रातील संपूर्ण परिस्थिती एका क्लिकवर

नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत.

Unseosonal Rain : कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान, जाणून घ्या महाराष्ट्रातील संपूर्ण परिस्थिती एका क्लिकवर
nagpur-minImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 20, 2023 | 3:16 PM
Share

संदीप जाधव, महाराष्ट्र : महाराष्ट्रात (maharashtra) मागच्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने (unseasonal rain) जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात भयावह अशी स्थिती निर्माण झाली आहे. नांदेड, नागपूर, नंदुरबार, वाशिम या जिल्ह्यांमध्ये शेतीचं अधिक नुकसान झालं आहे. पंचनामे करुन तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (farmer) केली आहे. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्रात पाहणी दौरा केला आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी शेतात जाऊन पाहणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

farmar news

farmar news

नागपूर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांनाच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसाने भुईसपाट झालं आहे. आता बळीराजा सरकारी मदतीची अपेक्षा करीत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेडसह अनेक भागात काल गारपीट झाली. उभं असलेलं गव्हाचं हे पीक बघा अगदी भुईसपाट झालं. कापणीला आलेला गहू अक्षरशः झोपला. गहू जमिनीला लागल्याने तो खराब व्हायला लागला आहे. त्यामुळे गहू काळा पडून खराब होत असल्याने त्याला बाजारात भाव तर मिळत नाही. पण तो भरत सुद्धा नसल्याने त्याचे नुकसान होत आहे. गव्हाच्या पिका प्रमाणेच भाजीपाला पिकाच सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. कोबीतर अक्षरशः गारांच्या मारामुळे झाडालाच काळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनाच अतोनात नुकसान झालं असून आता शेतकरी मायबाप सरकारकडे मदतीची मागणी करत आहे .

नागपूर जिल्ह्यात संत्रा , कापूस, गहू, चना ही पीक आता हाताशी आली होती. या सगळ्या पिकांच गारपीटीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे विदर्भात पिकाचं १०० कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. फळबागा, संत्रा, हरभरा, गहू, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत. त्यामुळं या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. संत्र्याला आलेला आंबिया बहार गळून पडलाय. गारपीट मुळं झाडावर असलेला संत्रा अक्षरशः फुटला. आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल