AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली

अवकाळी पावसाने आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या मुळावर उठलेले आहे. यावळी तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. पण सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री अवकाळीने हजेरी लावली आहे.

Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली
सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावल्याने आंबा फळपिकाचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 10:53 AM
Share

सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाने (Mango Fruit Crop) आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या मुळावर उठलेले आहे. यावळी तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. पण (Konkan) सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री (Unseasonal Rain) अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेला आणि कैरी अवस्थेतील आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. मध्यंतरीच्या निरभ्र वातावरणामुळे अवकाळीचे संकट दूर झाले असे वाटत असताना पुन्हा एकदा निसर्गाने लहरीपणा दाखवलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आंबा या फळपिकाचे होणार आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

5 एप्रिलपासून राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, अकोला, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यामंध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोकण भागात 4 एप्रिल रोजी रात्रीच पावसाला सुरवात झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली आहे. एकीकडे ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसत असतानाच मराठवाड्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ झाली आहे. तर उर्वरीत राज्यात सरासरीप्रमाणे तापमान आहे.

तीन दिवस धोक्याचेच

भर उन्हाळ्यातही पावसाची अनुभती काही भागात येत आहे. 5 एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे.6 एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर 7 एप्रिल रोजीही याच भागांमध्ये अवकाळीचे संकट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आंब्याचे अंतिम टप्प्यातही नुकसानच

हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाचा परिणाम आंबा फळबागांवर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण आता तोडणीला आलेल्या आंब्यालाही फटका बसत आहे. मध्यंतरी आंबा उत्पादक संघाने यंदा केवळ 25 टक्के फळपिक शेतकऱ्यांच्या हाती लागल्याचे सांगितले होते. आता हंगामाच्या शेवटच्या बहरावरच सर्वकाही अवलंबून होते. असे असताना पुन्हा अवकाळीचे संकट ओढावल्याने फळगळ आणि कैऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादकांना प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची.

संबंधित बातम्या :

Amravati Farmer : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, ‘असा’ घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा

Hapus Mango : ‘शिवनेरी’ हापूसलाही भौगोलिक मानांकन..! जुन्नरच्या वैभवात पडणार भर

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....