शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय

कोरोना काळात सर्वच घटकांवर परिणाम हा झालेला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐवढेच नाही तर शेतकरी संघर्ष संघटनेच्या कामामध्येही शिथिलता आली होती. आता धोका टळला नसला तरी सर्वकाही पुर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळेच संघटनाही आता सक्रीय होणार आहे. त्याच अनुशंगाने सोमवारी शेतकरी चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या निफाड तालुक्यातून या बैठक पार पडली.

शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:45 PM

लासलगाव : कोरोना काळात सर्वच घटकांवर परिणाम हा झालेला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐवढेच नाही तर शेतकरी संघर्ष संघटनेच्या कामामध्येही शिथिलता आली होती. आता धोका टळला नसला तरी सर्वकाही पुर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळेच संघटनाही आता सक्रीय होणार आहे. त्याच अनुशंगाने सोमवारी शेतकरी चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या निफाड तालुक्यातून या बैठक पार पडली. शेतकरी संघर्ष संघटनेची संस्थापक अध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी कायदा करावा या मागण्यांसह नऊ ठराव मंजूर करण्यात आले.

काय आहेत शेतकरी संघर्ष संघटनेचे ते 9 ठराव

1) कर्नाटक राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनेचे समर्थन करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला.

2) केंद्र सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारित करावे.

3) रानवड साखर कारखाना सुरू झाल्या बद्दल आ. दिलीप बनकर, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आघाडी सरकारचे अभिनंदन केले. तसेच शासन स्तरावरील अडचणी दूर होऊन निसाका सुरू केला जावा असा ठराव या वेळी करण्यात आला.

4) वीज वितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्यावी.

5) वैद्यनाथ साखर कारखाना, छत्रपती साखर कारखाना, द्वारकाधीश साखर कारखाना, संगमनेर साखर कारखाना यांच्याकडची थकीत रक्कम शेतकरी, कामगार यांना तात्काळ अदा करावे.

6) केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे नाफेड कांदा खरेदी मध्ये अधिकारी व्यापारी संगणमत करून घोटाळा करत असल्याने याबाबत सीबीआय चौकशी करावी.

7) द्राक्ष बागायतदार संघाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी ठरवलेल्या द्राक्ष मूल्यांचे अंमलबजावणी व्हावी.

8) बॅंकांची शेतकऱ्याला दिलेली कर्जे बेकायदेशीर दिले असतील तर ती अनैतिक ठरवली पाहिजे.

9) नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य घोषित केले असतांना वन्यप्राणी अभयारण्य लावलेले बेकायदेशीर बोर्ड तात्काळ काढावा असा ठराव करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी हक्कासाठी नवी चळवळ उभारणार

शेतकरी संघर्ष संघटना पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत या संघटनेत अनेकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर यांच्यासह शेतकरी संघर्ष संघटनेत अनेकांनी प्रवेश केल्याने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात चळवळ उभी करण्यासाठी मोठी ताकद निर्माण झाली असल्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.