AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी या दरम्यान, शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांवर काही फवारणी करु नये. वातावरणातील बदलाप्रमाणे मोहरी पिकावर चापा किडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 5:15 PM
Share

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होणार आहेच पण शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी या दरम्यान, शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांवर काही फवारणी करु नये. वातावरणातील बदलाप्रमाणे मोहरी पिकावर चापा किडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर हरभऱ्यावरील घाटीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे ते ही प्रति एकरी 8 लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे.

भाजीपाल्याच्या लागवडीसाठी पोषक वातावरण

सध्या पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी त्यानंतर मात्र, भाजीपाला लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. भोपळ्याची लागवड करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. याकरिता बियाण्यांमध्ये लहान पॉलिथीन पिशव्या भरून शिफ्ट हाऊसमध्ये ठेवावे लागणार आहे. कोबी, फुलकोबी, कोबी इत्यादींच्या रोपणासाठी पोषक वातावरण आहे. या हंगामात पालक, कोथिंबीर, मेथीही पेरता येते. भाजीपाल्यांची जोमात वाढ होण्यासाठी आणि त्यांच्या पानांच्या वाढीसाठी एकरी 20 किलो युरिया एकरी फवारता येईल.

करपा रोगाचे नियंत्रण महत्वाचे

सध्याच्या वातावरणात बटाटा आणि टोमॅटो या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. विशेषत: करपा रोगामुळे या पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बटाटा आणि टोमॅटोमधील करपा रोगावर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बांडीजम प्रति लिटर 1.o ग्रॅम किंवा डिथेन-एम-45.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. कांद्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भानृव झाल्यास डेथेन-एम-45 फवारणी करणे योग्य आहे. वाटाण्याच्या पिकावर 2 टक्के युरिया सोल्यूशन फवारून घ्यावा लागणार आहे. ज्यामुळे वाटाण्याच्या शेंगांची संख्या वाढणार आहे. याप्रमाणे 29 डिसेंबरपर्यंत फवारणी केल्यास भाजीपाल्याला तसेच रब्बीतील पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.