AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार तर होतेच. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर सरासरीच्या तुलनेत 200 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे आज (सोमवारी) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमके काय होणार याकडे शेतकऱ्यांच्यासह व्यापारी यांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे.

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही....
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दर स्थिर आहेत.
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 3:15 PM
Share

लातूर : गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार तर होतेच. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर सरासरीच्या तुलनेत 200 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे आज (सोमवारी) (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमके काय होणार याकडे शेतकऱ्यांच्यासह व्यापारी यांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्याच दिवशी (Soybean) सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. 6 हजार 100 वरील सोयाबीन थेट 6 हजार 400 वर येऊन ठेपलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी सोयाबीन विक्री करताना काही नियमांचे पालन हे करावेच लागणार आहे. सोमवारी मात्र,  (Soybean arrivals increase) आवक अधिकची होऊनही दरात वाढ झाली. मात्र, कायम हीच परस्थिती राहणार नाही असाच विचार करुन आवकवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

आवक वाढूनही दर सुधारले

सोयाबीनची आवक वाढली की दरात घट हे ठरलेलेच आहे. सोमवारी मात्र, आवक वाढूनही दरात कमालीची वाढ झाली होती. मात्र, सोयापेंडवरील स्टॅाक लिमिट, सोयाबीनचे वायदे बंदी या केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम जर दरावर होऊ द्यायचा नसेल तर मात्र, आवक ही अटोक्यातच राहिलेली चांगली आहे. आवक वाढली तर दर कमी होण्याची शक्यता असते. शिवाय सोयाबीनचे दर हे गेल्या 21 दिवसांपासून अस्थिर आहेत. यातच मागणीपेक्षा अधिक आवक सुरु राहिली तर मात्र, दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी मात्र, अचानकच आवक न वाढवता टप्प्याटप्प्याने शेतीमाल बाजारात आणला तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

बियाणे सोयाबीनही बाजारात

नियमीत सोयाबीन बरोबर आता बियाणांचे सोयाबीनही बाजारात दाखल झाले आहे. मात्र, बियाणे सोयाबीनचे दर हे अधिक आहेत. तर दुसरीकडे तुरीची आवकही घटली आहे. तुरीला खरेदी केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर हा ठरवून दिलेला आहे. मात्र, अजून तूर खरेदी केंद्र ही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागत होती. पण 1 जानेवारी पासून खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. त्यामुळे शेतकरी तूर साठवणूकीवरच भर देत आहे. हमीभावापेक्षा कमी भावात नुकसान करुन घेण्यापेक्षा साठवणूक केली जात आहे. सध्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली शेतकऱ्यांना त्यााचा लाभ घेता येणार आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6000 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6050 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6116 रुपये क्विंटल, जानकी चना 4750 रुपये क्विंटल, विजय चणा 4635, चना मिल 4500, सोयाबीन 6491, चमकी मूग 7000 , मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7100 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

वर्षभर कष्ट केलं तरीपण द्राक्ष निर्यातीचं स्वप्न भंगले, सांगा शेती करायची कशी ?

Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको

मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.