AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतीमालावर नेमका परिणाम कशाचा?

सोयाबीनला विक्रमी दर मिळेल ही आशा तर आता मावळली आहेच पण सरासरीएवढा दर तरी टिकून राहवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात सोयाबीनला 7 हजार 200 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय अंतिम टप्प्यात यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा असताना केंद्राने सोयापेंडची आयात केल्याने स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला.

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतीमालावर नेमका परिणाम कशाचा?
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 07, 2022 | 3:03 PM
Share

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Agricultural Good Rate) शेतीमालाच्या दरात अशी काय घसरण सुरु झाली आहे की, शेतकऱ्यांना आपला माल विकावा की साठवणूक करुन ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राने सोयापेंडची केलेली आयात आणि खाद्यतेलावरील घटलेले आयातशुल्क याचा परिणाम थेट (Soybean Rate) सोयाबीनवर झालेला आहे. तर दुसरीकडे सोयाबीनपाठोपाठ (Rabi Season) रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरही गडगडले आहेत. हरभरा 4 हजार 200 रुपयांवरच येऊन ठेपला आहे. वाढलेले उत्पादन आणि खरेदी केंद्राबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय याचा परिणाम हरभरा दरावर झालेला आहे. हे कमी म्हणून की काय तुरीला हमीभावापेक्षा कमी दर खुल्या बाजारपेठेत मिळत आहे. घटत्या दरामुळे बाजार समितीमधील शेतीमालाची आवक ही घटलेली आहे. मुख्य तीन पिकांच्या बाबतीतच असे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे.

तीन महिन्यात 1 हजार रुपयांनी घसरले सोयाबीन

सोयाबीनला विक्रमी दर मिळेल ही आशा तर आता मावळली आहेच पण सरासरीएवढा दर तरी टिकून राहवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात सोयाबीनला 7 हजार 200 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय अंतिम टप्प्यात यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा असताना केंद्राने सोयापेंडची आयात केल्याने स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला. उद्योजकांनी सोयाबीन खरेदीकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे तीन महिन्यात 1 हजार रुपयांनी सोयाबीन घसरले आहे. हे कमी म्हणून की काय आता उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागले आहे.

खरेदी केंद्र बंदचा परिणाम हरभरा दरावर

राज्यातील खरेदी केंद्र अचानक बंद झाली आहेत. खरेदी केंद्रावर प्रति क्विंटलला 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला होता. या दराचा चांगलाच आधार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळत असतानाच केंद्राने अचानक निर्णय घेतल्याने मोठे नुकसान झाले आहे. 23 मे रोजीच केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 200 असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मालाची साठवणूक करावी का? असा सवाल उपस्थित होत आहे.

तुरीलाही हमीभावापेक्षा कमीच दर

खरीपातील तुरीची आवक सुरु झाल्यापासून दरात काही सुधारणाच झाली नाही. पावसामुळे तुरीचा दर्जा ढासळला होता. तर बाजारपेठेत उठावही पाहवयास मिळाला नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर 6 हजार 300 दर ठरवून देण्यात आला होता तर आता बाजारपेठेत 6 हजार 100 रुपयांनी तुरीची खरेदी सुरु आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना गरज असताना एकाही शेतीमालाला अपेक्षित दर नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून उलट गरजेच्या वेळी कवडीमोल दरात विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला जात आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.