AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM-kisan Scheme : योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?

आतापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये 1 लाख कोटी 62 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामध्ये कोणताही मध्यस्ती केंद्र सरकारने ठेवला नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रिसंग तोमर यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीचे सरकार मदतीची घोषणा करायचे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ती रक्कम मिळताना मोठी तफावत राहत असल्याचे ते म्हणाले.

PM-kisan Scheme : योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 2:48 PM
Share

मुंबई : (Farmer) शेतकऱ्यांसाठी योजना तर अनेक राबवल्या जात होत्या मात्र, प्रत्यक्षात निधी जमा होताना त्यामध्ये मोठी तफावत असायची. दलालांच्या मध्यस्तीमुळे लाभार्थी हा वंचित राहत होता. नेमका याच बाबींवर लक्ष केंद्रीत करीत (central Government) मोदी सरकारने यंत्रणाच बदलून टाकली आहे. आतापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये 1 लाख कोटी 62 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामध्ये कोणताही मध्यस्ती केंद्र सरकारने ठेवला नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रिसंग तोमर यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीचे सरकार मदतीची घोषणा करायचे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ती रक्कम मिळताना मोठी तफावत राहत असल्याचे ते म्हणाले.

विज्ञान भवनात डिपॉझिट अॅश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, तोमर यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून योजनांमध्ये किती तत्परता आली आहे हे पटवून दिले. मोदा सरकारने जनतेच्या हीताचे अनेक निर्णय घेतल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकही योजनेचा लाभ घेऊ शकत आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी पन्नास टक्के नागरिकांचे खातेही बॅंकेत नव्हते. यामध्ये सुधारणा करुन आता सर्व जनतेला विकासाच्या प्रवाहात आणले असल्याचे तोमर यांनी सांगितले.

पीएम किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 10 हप्त्याचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशात 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे. योजनेत तत्परता यावी त्या अनुशंगाने केंद्र सरकारने पावले उचललेली आहेत. त्यामुळे जो लाभार्थी त्याच्याच खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.

बँक बुडीत निघाली तरी मिळणार 5 लाख रुपये

बॅंक ग्राहकांच्या ठेवीवर विमा ही योजना 60 व्या दशकात नावारुपाला आली होती. त्यावेळी बॅंकेत जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच हमी दिली जात होती. यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होत होते. त्यानंतर ही रक्कम वाढवून 1 लाख पर्यंत करण्यात आली होती. मात्र, हे पैसे केव्हा मिळणार याबाबत कोणतेही तरतूद नव्हती. कोणतेही नियम हे ठरवून देण्यात आले नव्हते. त्यामुळे बॅंकेत पैसे ठेऊनही ग्राहकांच्या जीवाला घोर कायम होता. आता 1 लाख ऐवजी 5 लाखाची तरतूद केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे बॅंक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

90 दिवसांच्या आतमध्ये मिळणार रक्कम

बॅंक बुडीत निघाली तर पैसे मिळणार पण कधी? यासाठी कोणताही कायदा ठरविण्यात आला नव्हता. यामध्येही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता 90 दिवसांच्या आतमध्ये ही रक्कम देण्याचे निर्देश केंद्र सरकारने बॅंकांना दिलेले आहेत. म्हणजेच 3 महिन्यांच्या आतमध्ये ही रक्कम संबंधित ग्राहकांना मिळणार आहे. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून रखडलेले पैसे हे ठेवीदारांना काही दिवसांपूर्वीच परत मिळालेले आहेत. ही रक्कम जवळपास 1300 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Rabbi Season | रब्बी पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव, किड व्यवस्थापनासाठी महत्वाची बातमी

ढगाळ वातावरणाचा दुहेरी फटका, कांद्यावर बुरशी अन् बिजोत्पादनही अडचणीत, काय आहे पर्याय

Marathwada | 4 हजार रुपये क्विंटलच बेणं अन् 700 रुपये अद्रकला दर, सांगा शेती करायची कशी?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.