AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे.

Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकरी आत्महत्या
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 24, 2022 | 11:53 AM
Share

चंद्रपूर : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाहीतर तो आता शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी कशी या विवंचनेतून राजुरा तालुक्यातील अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने कीड-रोगराईचा बंदोबस्त करण्याासाठी आणलेले किटकनाशक पिऊनच (Farmer suicide) आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पिकांचे झालेले नुकसान आणि नापिकी यामुळे अमितच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. त्यामुळे शेती करावी कशी असा सवाल तरुण शेतकऱ्यांपुढे देखील आहे. पेरणी होताच झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान भरुन कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहेत.

गतवर्षीच वडिलांची आत्महत्या अन् यंदा मुलाची

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. गतवर्षी खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे नापिकी आणि झालेले नुकसान पाहून अमित मोरे यांच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. यंदा पुरामुळे पिकेच नाहीतर शेत जमिनीही खरडून गेल्याने काय करावे या नैराश्यातून अमितनेही वडिलांप्रमाणेच आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे पिकांतील रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आणलेले किटकनाशकच प्राशन करुन त्याने जीवन संपवले आहे.

10 एक्कर शेती अन् 2 लाखाचे कर्ज

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे. पिकांचे नुकसान भरुन निघाले असते पण जमिनाचे काय ? यामधूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

भावाच्या मदतीने शेती व्यवसाय

गतवर्षी अमित मोरे यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अमितचा भाऊ आणि ते दोघे मिळून शेती करीत होते. भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र ताज्या पुराच्या संकटाने दोन लाख रुपये कर्ज असलेला हा शेतकरी खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीककडे सरकार मोठ-मोठ्या घोषणा करीत आहे. अन् स्थानिक पातळीवर भलतेच चित्र आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?