AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप

Tyre Punctures | वारंवार टायर पंक्चर होत असले तरी अनेक जण ते रिपेअर करुन काम भागवतात. पण सातत्याने टायर पंक्चर होत असेल तर मात्र अलर्ट राहा. कारण तुम्हाला एखाद्यावेळी ही चालढकल महागात पडेल. कितीवेळा टायर पंक्चर झाले तर ते बदलवणे गरजेचे आहे, माहिती आहे का?

कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप
| Updated on: Feb 23, 2024 | 3:16 PM
Share

नवी दिल्ली | 23 February 2024 : कार चालविताना अनेकदा टायर पंक्चर होते. जवळपास मॅकेनिक नसेल तर ते दुरुस्त करणे आपल्याला जमत नाही. अशावेळी स्टेफनी उपयोगात येते. अनेक भागात अजूनही अंतर्गत रस्ते चांगले नाहीत. एका शहरातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. अशावेळी वारंवार कारचे टायर पंक्चर होण्याची भीती कायम असते. पण अनेक वाहनधारक वारंवार टायर दुरुस्त करुन तेच दामटवतात. पण असे थिगळं लावलेले टायर किती दिवस कामाला येते, याची शाश्वती नसते. कितीवेळा टायर पंक्चर झालं तर ते दुरुस्त करावं, याची माहिती आहे का ?

कारचे संपूर्ण वजन टायरवर असते. कार रस्त्याच्या मध्येच बंद पडू नये यासाठी टायर चांगले असणे आवश्यक आहे. पण अनेकदा रस्त्यात टायर पंक्चर होतेच. त्यावेळी टायरचे पंक्चर काढून आपण वेळ मारुन नेतो. पण वारंवार टायर पंक्चर झाले असेल आणि तरीही तेच वापरत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

ट्यूब आणि ट्यूबलेस टायर दरम्यान काय फरक

  • पंक्चर झाल्यावर ट्यूबवाल्या टायरमधून लागलीच हवा बाहेर पडते. तर ट्यूबलेस टायरमध्ये बऱ्याच वेळपर्यंत हवा असते. पण ट्युबवाले टायर जर दोन तीन वेळा पंक्चर झाले तर त्याचे ट्यूब लवकर खराब होते. पंक्चर करताना मलमपट्टी लावण्यात येते. अनेकदा ही पट्टी पण निघते. त्यामुळे ट्यूब खराब होते. टायरमधील नवीन ट्यूब बदलणे आवश्यक असते.
  • उलट ट्यूबलेस टायर जर पंक्चर झाले तर त्यातील हवा खूप वेळ असते. यामध्ये खिळा घुसला अथवा छोटी वस्तू घुसून पंक्चर झाले तर कार चालक ते स्वतःहून दुरुस्त करु शकतो. हे टायर रिपेअर करणे पण सोपे असते. स्वस्त असते. पण पंक्चर टायर जर जास्तच खराब झाले तर मग ट्यूब आणि टायर बदलणे आवश्यक असते. टायरचा जास्त वापर झाला तर ते लवकर पंक्चर होते.

किती पंक्चरनंतर बदलावे टायर?

टायर वारंवार पंक्चर होत असले तरी पंक्चर काढून अनेकदा ते वापरण्यात येते. ही धकवण्याची कवायत एखाद्यावेळी प्रवासात महागात पडते. सातत्याने टायर पंक्चर झाले तर ते खराब होते. असे टायर फाटण्याची शक्यता अधिक असते. समजा तुमचे टायर 3-4 वेळा वा त्यापेक्षा अधिकवेळा पंक्चर झाले तर ते बदलणे आवश्यक आहे. दोन पंक्चरमध्ये 150 एमएमपेक्षा कमी अंतर असेल तर ते टायर बदलणे योग्य मानण्यात येते.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.