कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप

Tyre Punctures | वारंवार टायर पंक्चर होत असले तरी अनेक जण ते रिपेअर करुन काम भागवतात. पण सातत्याने टायर पंक्चर होत असेल तर मात्र अलर्ट राहा. कारण तुम्हाला एखाद्यावेळी ही चालढकल महागात पडेल. कितीवेळा टायर पंक्चर झाले तर ते बदलवणे गरजेचे आहे, माहिती आहे का?

कितीवेळा पंक्चर झाल्यावर टायर बदलवणे आवश्यक? नाही बदलले तर भररस्त्यात होतो मनस्ताप
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:16 PM

नवी दिल्ली | 23 February 2024 : कार चालविताना अनेकदा टायर पंक्चर होते. जवळपास मॅकेनिक नसेल तर ते दुरुस्त करणे आपल्याला जमत नाही. अशावेळी स्टेफनी उपयोगात येते. अनेक भागात अजूनही अंतर्गत रस्ते चांगले नाहीत. एका शहरातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. अशावेळी वारंवार कारचे टायर पंक्चर होण्याची भीती कायम असते. पण अनेक वाहनधारक वारंवार टायर दुरुस्त करुन तेच दामटवतात. पण असे थिगळं लावलेले टायर किती दिवस कामाला येते, याची शाश्वती नसते. कितीवेळा टायर पंक्चर झालं तर ते दुरुस्त करावं, याची माहिती आहे का ?

कारचे संपूर्ण वजन टायरवर असते. कार रस्त्याच्या मध्येच बंद पडू नये यासाठी टायर चांगले असणे आवश्यक आहे. पण अनेकदा रस्त्यात टायर पंक्चर होतेच. त्यावेळी टायरचे पंक्चर काढून आपण वेळ मारुन नेतो. पण वारंवार टायर पंक्चर झाले असेल आणि तरीही तेच वापरत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

ट्यूब आणि ट्यूबलेस टायर दरम्यान काय फरक

हे सुद्धा वाचा
  • पंक्चर झाल्यावर ट्यूबवाल्या टायरमधून लागलीच हवा बाहेर पडते. तर ट्यूबलेस टायरमध्ये बऱ्याच वेळपर्यंत हवा असते. पण ट्युबवाले टायर जर दोन तीन वेळा पंक्चर झाले तर त्याचे ट्यूब लवकर खराब होते. पंक्चर करताना मलमपट्टी लावण्यात येते. अनेकदा ही पट्टी पण निघते. त्यामुळे ट्यूब खराब होते. टायरमधील नवीन ट्यूब बदलणे आवश्यक असते.
  • उलट ट्यूबलेस टायर जर पंक्चर झाले तर त्यातील हवा खूप वेळ असते. यामध्ये खिळा घुसला अथवा छोटी वस्तू घुसून पंक्चर झाले तर कार चालक ते स्वतःहून दुरुस्त करु शकतो. हे टायर रिपेअर करणे पण सोपे असते. स्वस्त असते. पण पंक्चर टायर जर जास्तच खराब झाले तर मग ट्यूब आणि टायर बदलणे आवश्यक असते. टायरचा जास्त वापर झाला तर ते लवकर पंक्चर होते.

किती पंक्चरनंतर बदलावे टायर?

टायर वारंवार पंक्चर होत असले तरी पंक्चर काढून अनेकदा ते वापरण्यात येते. ही धकवण्याची कवायत एखाद्यावेळी प्रवासात महागात पडते. सातत्याने टायर पंक्चर झाले तर ते खराब होते. असे टायर फाटण्याची शक्यता अधिक असते. समजा तुमचे टायर 3-4 वेळा वा त्यापेक्षा अधिकवेळा पंक्चर झाले तर ते बदलणे आवश्यक आहे. दोन पंक्चरमध्ये 150 एमएमपेक्षा कमी अंतर असेल तर ते टायर बदलणे योग्य मानण्यात येते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.