AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन या तारखेपासून अनिवार्य, केंद्रीय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

मोठ मोठे ट्रक हायवेवरून धावताना आपण पाहिले आहेत. पण हे ट्रक चालवताना ड्रायव्हर्सची चांगलीच दमछाक होते. वातानुकूतित केबिन नसल्याने अनेकदा ट्रक चालक अस्वस्थ होतात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. आता ट्रकच्या कामकाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पाऊल उचललं आहे.

भारतात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन या तारखेपासून अनिवार्य, केंद्रीय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
मोठ्या गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हर्संना मिळणार सुखद अनुभूती, या तारखेपासून एसी केबिन बंधनकारक
| Updated on: Dec 12, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई : ट्रक चालवत लांब पल्ला गाठताना ड्रायव्हर्संची चांगलीच दमछाक होते. रस्त्याचा अंदाज आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पुरते बारा वाजतात. त्यात लांब पल्ल्याचा प्रवास करताना इंजिन चांगलंच तापतं आणि केबिनमध्ये बसलेल्या चालकांना गाडी चालवताना त्रास होतो. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं. ड्रायव्हर्सचा थकवा कमी करण्यासाटठी सर्व ट्रक वातानुकूलित करण्याचा विडा त्यांनी उचलला होता. त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश येईल असं म्हणायला हरकत नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत सांगितलं आहे की, “1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या एन२ आणि एन३ श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवली आहे. तसेच एअर कंडिशनिंग सिस्टम असलेल्या केबिनची चाचणी भारतीय मानक संस्थेच्या नियमानुसार असावी.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की, ‘भारतातील ट्रक ड्रायव्हर्स हा सार्वजनिक वाहतुकीतील सर्वाधिक दुर्लक्षित विभाग आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ट्रक चालक काम करत असतात. त्यांच्यावर देशातील जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्याची जबाबदारी असते. अनेकदा ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते. यामुळे अनेकदा महामार्गावर रस्ते अपघात होऊ शकतात.’ एन2 कॅटेगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 3.5 टनाहून जास्त आणि 12 टनापेक्षा कमी असतं. तर एन3 कॅटगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 12 टनापेक्षा अधिक असते.

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “ट्रक चालकांचं काम आणि प्रवास सुखकर करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तसेच त्यांना लांबच्या पल्ल्यात थकवा जाणवणार नाही.” एसी केबिनमुळे व्यवसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ होईल असं सांगण्यात आहे. या निर्णयावर काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पण याकडे आता सकारात्मक बदल म्हणून पाहणंही तितकंच गरजेचं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.